पान पिंपरी, कापुस, सहीत इतरही उत्पादक शेतकरी अडचणीत
अनिल गौर
जिल्हा प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज अमरावती
अमरावती – जिल्ह्यातील (अंजनगाव सुर्जी) गेल्या दोन दिवसा पासून महाराष्ट्र सहीत तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली परंतु या आलेल्या पावसामुळे व निसर्गाच्या चक्रा मुळे तालुक्यातील शेतकरी कमालीचा संकटात आलेला आहे दरवर्षी पेक्षा या वर्षी पाऊस नसल्या सारखाच होता परंतु थोड्या फार प्रमाणात ओलित असलेल्या शेतकऱ्यांनी पिक जगवले व थोड्याच प्रमाणात पिक उत्पादन करण्याचा प्रयत्न करत होता परंतु आलेल्या या अवकाळी पावसामुळे पान पिंपरी, कपाशी सहीत इतरही पिके धोक्यात आले.
पान पिंपरी तर अवकाळी पावसामुळे पुर्ण पणे वाळून जात असुन कपाशी ही पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर लागणार हे निश्चित आहे. पान पिंपरी चे पिक शेतकरी 12 महिन्याचे घेतो आणि अश्या प्रकारे पान पिंपरी पिक घरी येण्या आधीच गेले तर शेतकरी काय करणार असा फार मोठा प्रश्न शेतकऱ्यांना पडला तसेच पान पिंपरी पिक हे नागरिकांच्या आरोग्याची निगडीत आहे.
परंतु शासनाच्या अयोग्य धोरणानुसार व निसर्गाच्या आणि अनिमयित्ता मुळे पान पिंपरी उत्पादक शेतकरी आणखीनच संकटात सापडला आहे. तर कापुस उत्पादक सुद्धा संकटात आहे. या अवकाळी पावसामुळे इतरही अनेक पिके आहेत. या पावसामुळे नुकसानीच्या मार्गावर आहेत.

