सावित्री ब्रिगेडने केला एकल भगिनींचा सन्मान

0
323

सुविद्या बांबोडे
कार्यकारी संपादक
प्रबोधिनी न्युज

अखिल भारतीय सावित्री ब्रिगेड नागपूरचा भव्य हळदी कुंकू समारंभ स्व. तेजराज काटले सांस्कृतिक सभागृह ,
अयोध्यानगर येथे पार पडला.
उद् घाटनपर भाषणात विधी सेवा प्राधिकरण अधिकारी प्रीती सावरकर यांनी स्त्रियांच्या सबलीकरणासाठी विविध योजना असल्याचे प्रतिपादन केले. तळागाळातील परंतु स्वकर्तृत्वाने विविध क्षेत्रात स्वबळावर कार्य करणाऱ्या तसेच त्यांच्या कार्याची कोणीही दखल न घेतलेल्या एकल भगिनींचा हळद कुंकू लावून, गुलाब पुष्प,वाण आणि शाॅल देवून सन्मान करण्यात आला. प्रमुख अतिथी सरिता राणेकर यांनी हा उत्सव साजरा करतांना समाजभान जपावे तर जया काटले यांनी सावित्री ब्रिगेडचे कार्य वाखाणण्याजोगे आहे आहे असे प्रतिपादन केले.

या समारंभाच्या अध्यक्षिय भाषणात अखिल भारतीय सावित्री ब्रिगेडच्या अध्यक्ष डॉ. स्मिता मेहेत्रे म्हणाल्या,” समाजात एकल भगिनींना कोणत्याही शुभकार्यात सामावून घेतले जात नाही. त्यांना अपशकुनी न मानता त्यांचा घराघरात सन्मान व्हावा. त्यांच्या भावनांचा प्रत्येकांनी आदर करावा.” या कार्यक्रमाचे खुमासदार सूत्रसंचालन शितल बनसोड यांनी केले. प्रास्ताविकेतून प्रणोती कळमकर यांनी सावित्री ब्रिगेडची भूमिका विशद केली. एकपात्री प्रयोग, उखाणे स्पर्धा, विविध खेळात फार मोठ्या प्रमाणात भगिनींनी सहभागी होऊन बक्षीसं प्राप्त केली. भगिनींना मुलाखतीतून उज्वला पाटील यांनी बोलते केले.त्यांच्या संघर्षाची गाथा ऐकतांना उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू तरळले. आभार प्रदर्शन विद्या सुरकार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनंदा जांबुतकर, संगीता लंगडे, नंदा सोनुले, ॲड. रोमा खंडवानी, वंदना क्षिरसागर रेणुका जोशी, रेखा हिरुडकर, जयश्री मोहितकर, डॉ.ऋतुजा गोमासे, प्रियंका सोनुले, ज्योती मून आदींनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here