मतदानाला जाताना ह्याकडे लक्ष द्या,कोणाची हमी, गॅरंटी,आश्वासनाला बळी पडू नका-डॉ.जितीन वंजारे

0
88

बीड प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज

मतदान करण्यासाठी जाताना आपल्या घरातील सिलेंडरला नमस्कार करा आणि त्याला विचारा बाबा तू किती रुपयाला होतास आणि आता किती रुपयाला झालास सिलेंडर तुमच्या कानामध्ये स्पोर करून सांगेल त्याची किंमत ती चारशे वरून बाराशे झाली आहे आणि नंतर घरातील किचन ओट्यामध्ये जा किचनमध्ये तेलाचा डब्बा असेल त्या तेलाच्या डब्याला,शेंगादाण्याला, मसाल्यांना त्यांनाही एकदा विचारून जावा की तुमच्या किमती किती होत्या आणि आता तुमच्या किती किमती आहेत त्यांचा ठसका बसल्यानंतर जरा घरातील डाळी- डूळीचे डबे उचकुन पाहावा प्रत्येक डाळीने शंभरी पार केलेली आहे काही डाळींनी 200 ही पार केलेले आहेत त्यांनाही एकदा साष्टांग दंडवत घाला आणि नंतर घराबाहेर पडा आपण जे प्राथमिक गरजा म्हणून अन्न वस्त्र निवारा याच्याकडे पाहतो या जीवनावश्यक गोष्टी आपल्याला लागतात त्या सर्वांचेच भाव अगदीच गगनाला भिडलेले आहे त्या सर्वांवर जीएसटी लाऊन भयानक रेट वसूल केले जातात.परंतु त्या मानाने आपले उत्पन्न, आपला रोजगार, आपल्याला आपल्या शिक्षणाचा फायदा मिळत नाहीये करोडो मुले सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना हाताला काम नाही.बेरोजगार पडले आहेत त्यामुळे खरे लाभार्थी ह्यांना करून गोर गरिबांसाठी काम करण्याची गरज आहे परंतु या देशांमध्ये काल्पनिक देव-धर्मावरती काम होत आहे वास्तववादी प्रश्न सरकार कोणाचेही असले तरी तेच प्रश्न आहेत.आपल्या घरातील समोर लावलेल्या गाड्यांना विचारा तुम्हाला लागणार पेट्रोल, डिझेल आज गगनाला भिडले आहे. खायच्या तेलापासून इंधनाच्या तेलापर्यंत महागाईने हा-हाकार मागवलेला आहे. मतदान करण्यासाठी जाताना पेट्रोल,डिझेल,गॅस दरवाढी ला नमस्कार करा आणि मगच मतदान करा एवढं झालं असेल तर घरातील छोटे छोटे मुलं यांच्या शिक्षणाच्या होणाऱ्या बाजारीकरणाला,प्रायव्हेट शाळेमधील भरमसाठ वाढलेल्या फीस ला नमस्कार करा. शिक्षण हे फक्त श्रीमंताचीच मक्तेदारी करू पाहणाऱ्या आणि आपली मायबोली मराठी शाळा बंद पाडणाऱ्या येथील खळगुट्या राजकारणी लोकांना नमस्कार करा आपल्या शिक्षणाचे बाजारीकरण करून मोफत शिक्षण बंद करणाऱ्या जिल्हा परिषद शाळा बंद करणाऱ्या उर्दू मेडीयम शाळा बंद करणाऱ्या प्रादेशिक भाषा जतन करणाऱ्या शाळा बंद करणाऱ्या याच धूर्त राजकारण्यांना साष्टांग दंडवत घालून सद्सद्विवेक बुद्धीने मतदान करा. त्याचबरोबर मतदानाला जाताना आपल्याच घरातील शेतीतील उत्पन्नाचा हिशोब ठेवून झालेला खर्चही निघत नाही घरामध्ये वय वाढलेली बहीण आता लग्नाला आलेली आहे तिचं लग्न करायचं कसं,घरातील मोठा आणि छोटा भाऊ बेरोजगारीने खीतपत पडलेला आहे नोकरी नसल्यामुळे त्याचं लग्न होत नाहीये हाताला काम नाहीये या सर्व विवंचनेत घरातील कर्त्याधरत्या बापाने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केलेले आहे. बापाचा फोटो घराला टांगलेला आहे, आईच्या कपाळाला कुंकवाचा दुष्काळ आहे कोरड्या ठाण कपाळाने माझा पती या महागाईला कंटाळून कर्जबाजारी होऊन शेतकरी आत्महत्या करून मेला हे ओरडून सांगणाऱ्या आईला साष्टांग दंडवत करून मगच मतदान करा. त्याचबरोबर समाजामध्ये सुशिक्षित तरुणांना ज्यांच्यामध्ये राजकीय काम करण्याचे सामर्थ्य असून केवल घराणेशाही आणि पैसा या दोन गोष्टीला महत्त्व देऊन एकाच घरातील अनेकांना बार-बार संधी देऊन राजकीय क्षेत्रामध्ये मक्तेदारी करणाऱ्या आणि गेंड्याची कातडी पांघरून सरकार चालवणाऱ्या जातीयवादी, प्रांतवादी,पक्षवादी,धर्मवादी नेत्यांना साष्टांग दंडवत करा त्यांचे अत्याचार अन्याय अजून किती वर्ष आपण सहन करणार आहोत याचा आलेख तयार करा त्याची घराणेशाही केंव्हा बंद करायची आहे हे ठराव आणि नंतरच मतदान करण्यासाठी जावा. आपल्या घरातील लहान लहान मुलं युवा वर्ग हा या देशाचा भविष्यातला आधारस्तंभ असून आपण आज आवाज नाही उठवला तर भविष्यातील परिणामांना सामोरे जाण्यासाठी आपणच जबाबदार असू भविष्यातील पिढ्या सक्षम करण्यासाठी आजच आपल्याला आवाज उठवणे गरजेचे आहे नसता महामानव विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या मताचा अधिकार काय कामाचा? आपलं मत हे देशातील सरकार कोणाच आणायचा आणि कोणाचं पाडायचं याची निर्णायक नांदी असून ते एक दोन आण्यामध्ये विकू नका कोणाची मटण भाकरी आणि दारू पिऊन आणि पाचशे घेऊन स्वतःला विकू नका विचारपूर्वक आपल्या विकासाच्या निरपेक्षवादी मनाने विचार करून शेतीप्रधान देशांमध्ये शेतकऱ्याला मालामाल आणि शेतीला सुजलाम आणि सुफलाम करणाऱ्या,शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवणाऱ्या नेत्यांनाच निवडून दिलं गेलं पाहिजे नसता मंदिर बांधतो l,मज्जिद बनवतो,बॉम्ब टाकतो,पाकिस्तान उध्वस्त करतो, 56 इंचची छाती, 370 कलम, हिंदू राष्ट्र निर्मिती, प्रांतवाद या आणि अशा तस्तम कुचकामी गोष्टी सांगून आपला विकास होणार नाही या गोष्टी महत्त्वाच्या नसून येथील शेतकऱ्याचे उत्पन्न पाचपट झालं पाहिजे,शेतीला सिंचनाच्या गोष्टी निर्माण झाल्या पाहिजेत, नदीजोड प्रकल्प अमलात आणले पाहिजेत, गावोगावी पाणी अडवून जलसिंचनाचे जाळे निर्माण करून शेतकऱ्यांच्या बांधावरती मोफत आणि मुबलक पाणी, मोफत आणि मुबलक वीज, मोफत आणि मुबलक आरोग्याच्या योजना राबवल्या गेल्या पाहिजे,मोफत शिक्षण,मोफत आरोग्य पुरवलं पाहिजे,येथील शहर स्वच्छ सुंदर येथील नद्या स्वच्छ सुंदर येथील परिसर-पर्यावरण प्रदूषण विरहित झालं पाहिजे येथील गोरगरीब जनतेला येथील युवकाला हाताला काम पाहिजे, नोकरी पाहिजे,येथे उद्योगधंदे आले पाहिजेत, ज्ञान आणि टेक्नॉलॉजीचे आदानप्रदान झाले पाहिजे, परंतु इथे मंदिर उभा करून भिकारी निर्माण केले जात आहेत,इथे आपला कार्यकर्ता आंधभक्त बनऊन ब्रेन वॉश करून युवकांना गुलाम बनवले जात आहे.परंतु देश वाचवताना गोरगरिबांच्या हाताला काम असणं खूप महत्त्वाचा आहे येथील युवक लहान थोर शिकला पाहिजे, त्याला शिक्षणाच्या सर्व संधी उपलब्ध हव्यात त्याही मोफत येथील भ्रष्टाचार शून्य झाला पाहिजे येथील जातिवाद, प्रांतवाद, धर्मवाद हद्दपार झाला पाहिजे या गोष्टींसाठी काम करणं महत्त्वाचं आहे.परंतु ज्या देशांमध्ये धर्माच्या नावावर सरकार स्थापन होतात तो देश रसातळाला गेल्याशिवाय राहत नाही हे वाक्य महामानव विश्वरत्न बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी त्याकाळी सांगितलं होतं ते आजही सत्य आहे आपण पाहतो आहोत इजराइल,जर्मनी आणि आखाती देश धर्मवादाच्या नावाने पुरते नष्ट झालेले आहेत. संगणकीय युगामध्ये काही गोष्टी दूर ठेवल्या गेल्या पाहिजेत आपली प्रगती हे राष्ट्राची प्रगती असते त्यामुळे देशातील नागरिक सुधारल्यास देश अपसुकच सुधरेल त्यामुळे येथील सामान्य जनतेच्या शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांच्या कामगारांच्या महिला अबाल वृद्धांच्या प्रगतीच्या गोष्टी करणं गरजेचं आहे त्यांच आरोग्य त्यांचे शिक्षण त्यांचे जवळपासचे पर्यावरण टेक्नॉलॉजी या गोष्टीमध्ये लक्ष दिलं गेलं पाहिजे आणि ह्याचा सारासार विचार करून जो ही नेता ज्याच्याकडे विकासाचे वर सांगितल्या प्रमाणे व्हिजन आहे अशांना मतदान करा नसता पावला-पावलावर चालण्यासाठी संविधान महत्त्वाचे असून संविधानामुळेच लोकशाही अबाधित आहे परंतु तेच संविधान बदलण्याच्या भाषा करणाऱ्या नालायक अवलादी शोधून काढून त्यांना हद्दपार केलं पाहिजे कारण गोरगरिबाचे संरक्षण करण्यासाठी महामानव विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिलेला आहे यामध्ये सर्वांना समसमान अधिकार आहेत जर संविधान बाजूला झालं तर दिवसाढवळ्या अन्याय अत्याचार होईल सत्ता एक हाती केंद्रित झाल्यामुळे थोड्याच दिवसांमध्ये श्रीमंत गरीब दरी निर्माण होऊन हुकूमशाहीला सुरुवात होईल जी की हे राष्ट्र रसातळाला नेऊन ठेवेल त्यामुळे ज्या ज्या लोकांनी संविधान बदलाची भाषा केलेली आहे त्यांना आपण मुळीच मतदान करू नका असे स्पष्ट सामाजिक कार्यकर्ते तथा राजकीय अभ्यास डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी मांडले आहे.
देशातील ही परिस्थिती बदलासाठी तुमचं बोट आणि वोट महत्त्वाचं असून ते कोणाला आणि का द्यायचं? याचा अभ्यास अगोदर करणे गरजेचे आहे लोक म्हणतील ही राष्ट्राची-देशाची निवडणूक आहे आपल्याला धर्म वाचवायचा आहे हिंदुराष्ट्र तयार करायचं आहे हे फक्त सत्तेसाठीचे चोचले आहेत.देशामध्ये हे करायचा आहे ते करायचा आहे परंतु ते तुमच्या शिक्षणासाठी,ग्रंथालयाची,विद्यापीठासाठी, तुमच्या उद्धारासाठी ते तुमच्या शेतीच्या योजनांसाठी कधीच बोलणार नाहीत कारण तुम्ही जर शिकले तुम्ही मोठे झाले तर तुम्ही त्यांची गुलामी करणार नाहीत तुम्ही त्यांचे गोबर भक्त बनणार नाहीत.त्यामुळे शैक्षणिक प्रगती करणाऱ्या शिक्षणाचे महत्त्व पटवून महाविद्यालय यूनिवर्सिटी निर्माण करणाऱ्या, शैक्षणिक प्रगती करणाऱ्या लोकांना मतदान केलं पाहिजे कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे ते पिल्यानंतर कोणीही गुरगुरल्याशिवाय राहणार नाही एकदा का तुम्ही शिकले तुमच्या बुद्धीचा विकास झाला तुमची सद्सद्विवेक बुद्धी जागृत होऊन तुम्हाला या समाजातील चांगलं आणि वाईट याची जाण होईल मग तुम्ही गोबर भक्त होणार नाही त्यामुळे येथील शिक्षण व्यवस्था यांना बंद पाडायची आहे. वर्षानुवर्ष काही जातींना गुलाम ठेवून काही विशिष्ट घराणे आणि विशिष्ट जातीच राजकारणामध्ये सक्रिय आहेत काही जातीच शिक्षणामध्ये सक्रिय आहेत,काहीच पूजा अर्चना मंदिर मुभा आहे बाकीचे गुलाम बनवायचे आहेत. त्यामुळे त्या त्या जातीचा प्रतिनिधी संसदेत नसल्यामुळे त्या त्या जातीच्या समस्या आजपर्यंत देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये पोहोचल्या नाहीत.प्रत्येक जातीचा धर्माचा प्रतिनिधी तिथे जाणे महत्त्वाचे आहेत आपले प्रश्न ठणकावून सांगितले जात नाहीत आणि म्हणून आपण नदीतील दगडाप्रमाने आहे तिथेच आहोत. त्यामुळे आपला नेता आपल्या मातीशी इमान राखणारा समाजाशी इमान राखणारा असला पाहिजे ना की कोणाची भडवेगिरी आणि गुलामगिरी करून संसदेत कटपुतली सारखा वागणारा नसावा.नाहीतर आपण काही काळापासून पाहतो आहे विशिष्ट जातीचा आदिवासी राष्ट्रपती जरी असेल आणि त्याला एखाद्या राममंदिर पूजेसाठी केवळ आदिवासी असल्याकारणाने नाकारले जात असेल त्यांना एखादा दलित समाजातील राष्ट्रपती जरी असला तरी तो दलील आदिवासी असल्यामुळे मंदिरात जाण्यास अडवलं जात असेल तर तुमच्या मनात किती जातीवाद धर्मवाद आहे हे यावरून स्पष्ट होते अशा दोगलेपणाची भाषा करणाऱ्या हरामखोरांना पायउतार केले पाहिजे.लोकशाही बळकट करण्यासाठी योग्य उमेदवाराला मतदान देऊन स्वतःची आणि राष्ट्राची प्रगती साधून घ्या.घरामध्ये तुटपुंज्य परिस्थितीत काटकसर करून जगणारी आपली माता माऊली ,शिक्षण घेऊन उपासमारी बेरोजगार होऊन फिरणारा आपला भाऊ बहिण,महागाई ने पार कंबरडं मोडून पडलेला संसार,कर्जबाजारी झालेला बाप,हमीभाव नसून तसाच सडत पडलेला शेतीमाल आणि कर्जाचा बोजा वाढत जाऊन आत्महत्या केलेला बाप आठवा आणि मगच मतदानाला जावा आणि खुशाल करा मतदान…!
पोरगं प्रचार करताना साहेबांचा विचार करत आहे जो त्याचा साहेब आज ह्या पक्षात उद्या त्या पक्षात स्वार्थासाठी माकड-उड्या मारतो आहे.कार्यकर्त्याला कोणता झेंडा घ्यायचा हेच कळत नाही कारण नेताच कपडे बदलल्या सारखा पक्ष बदलत आहे त्याला कार्यकर्त्याची फिकीर नाही अश्या गद्दाराना मतदार राजाचं नीट करेल.जो कार्यकर्ता नेत्यासाठी रस्त्यावर उतरून एकमेकांची डोके फोडतो त्यांनी आतातरी उघडा डोळे बघा नीट काय होतंय ते? एका ताटात नेते बिर्याणी खात आहेत आणि इकडे लोक राजकारनामुळे सख्या भावाची डोके फोडत आहे आहे अशीच अधोगती होऊन अजूनही सायकल वर हिंडतो आहे आणि नेता मात्र आलिशान गाडीत हिंडतो आहे आता ही गुलामी सोडा.नेत्याने त्याच्या दहा पिढ्या बसून खातील इतकी माय जमवली आहे तीही ह्याच्याच जीवावर पण अजूनही गुलाम होऊन सतरंज्या उचलणाऱ्या त्या गोबर भक्ताने आता जाग झाल पाहिजे.त्याला त्याचा आत्मसन्मान जागा करून दिला पाहिजे.धार्मिक गोमूत्र आणि गोबर खाऊन आलेली नशा त्याची दूर केली पाहिजे l,धर्माच्या अफूची त्यांनी दिलेली गोलीची नशा बाजूला सारा आणि त्याला विवेकी बुद्धी देऊन मतदान करायला पाठवा आणि मग देशात बदल होईल नसता जुमलेबाजी, इलेट्रॉलर बॉण्ड घोटाळा, इतर घोटाळे,पंधरा लाख,शेतकऱ्यांची दुप्पट इन्कम,गॅरंटी,वचन,फुकट राशन आणि मनातलं भाषण,भ्रष्टाचार, तुम हमे चंदा दो हम तुम्हे धंदा देंगे,घराणेशाही,नोकरी,बेरोजगारी ही सगळी जुमलेबाजी लक्षात आणून त्यावर मंथन करूनच नंतर मतदानाला जा आणि खुशाल ज्याला करायचं त्याला करा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते तथा राजकीय अभ्यासक डॉ जिती नदादा वंजारे खालापूरीकर यांनी केले आहे…..!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here