सागर शिंदे वाशिम जिल्हा प्रतिनिधी – वाशिम : आमरण उपोषण सोडविण्यासाठी नगरपंचायत मालेगांव चे मुख्याधिकारी यांनी दिलेल्या लेखी आश्वासनाची पूर्तता न झाल्यामुळे दि. 30 जुलै 2024 स्वतःला जाळून घेण्याचा इशारा उपोषण कर्ते गजानन काळे यांनी दिला असून तसे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर संबंधितांना दिले आहे. गजानन विजय काळे यांचे उपोषण सोडवताना येथील नगरपंचायत मुख्याधिकारी सतीश शेवदा यांनी लेखी आश्वासन दिले होते की, पुढील १५ दिवसांच्या आत सर्व मागण्या मान्य केल्या जातील व कामे केली जातील तसेच संबंधितांवर कारवाई केली जाईल परंतु अद्यापही कुठलेच काम मार्गी लागले नाही त्यामुळे आता मी गजानन विजय काळे दि. 30 जुलै २०२४ मंगळवार रोजी नगरपंचायत च्या हद्दीमध्ये स्वतःला जाळून दहन करणार आहे तरी आपण या बाबींची तातडीने दखल घ्यावी व संबंधित अधिकारी यांच्यावर योग्य ती कारवाई करून संबंधित कंत्राटदार यांच्यावर कार्यवाही करून कायमस्वरूपी परवाना रद्द करून काळा यादीत टाकावे जनतेच्या समस्यांचे निराकरण करावे अपेक्षित कार्यवाही झाली नाही तर मला स्वतःला जाळून दहन करण्याची वेळ येईल व याला सर्वस्वी जबाबदार नगर पंचायत चे मुख्याधिकारी, तहसिलदार साहेब मालेगांव, जिल्हाधिकारी, वाशिम शासन व प्रशासन राहील, तरी आपण तातडीने कारवाई करावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे केली आहे. गजानन काळे यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन ना. एकनाथरावजी शिंदे साहेब मुख्यमंत्री व नगर विकास मंत्री महाराष्ट्र राज्य, ना देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री तथा गृह मंत्री महाराष्ट्र राज्य, जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम, तहसिलदार तहसील कार्यालय मालेगांव, मुख्याधिकारी नगर पंचायत मालेगांव यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे.

