प्रथमतः डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले.
सांगली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – विटा – २४/०७/२०२४ विटा पोलीस उपनिरीक्षक विशाल काळे,भिंगार दिवे साहेब,महीला आघाडी महाराष्ट्र सहसचिव अलकाताई भंडारे मॅडम,सांगली जिल्हाध्यक्ष राजेंद्र (बापू) खरात, अखिल भारतीय होलार समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रणजित ऐवळे, वकील संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲड तुषार लोंढे, कलाकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील तोरणे, सरपंच नितीन सरवदे,यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ रामदास आठवले व्हिजन फाऊंडेशने संस्थापक अध्यक्ष तथा खानापूर तालुका अध्यक्ष नवनीत लोंढे साहेब यांच्या संकल्पनेतून हा उद्योग मेळावा आयोजित करण्यात आला होता.यावेळी बोलताना म्हणाले डॉ रामदासजी आठवले साहेब यांचा आदर्श घेऊन गोरं गरीब कष्टकरी शेतमजूर यांचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने उद्योग मेळावा आयोजित केल्या असल्याचे यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा खानापूर तालुका अध्यक्ष नवनीत लोंढे साहेब यांनी स्पष्ट केले.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा उद्योग केंद्र सांगलीचे व्यवस्थापक मा.अमरजित गायकवाड व जिल्हा उद्योग केंद्र निरीक्षक मा. नसरीन पटेल,यांनी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची अतिशय सुंदर पद्धतीने माहिती दिली.त्यामध्ये केंद्र शासनाने पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम येाजना आणि ग्रामीण रोजगार निर्मिती योजना या दोन योजना एकत्रित करुन पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (पीएमईजीपी) १५ ऑगस्ट २००८ पासून जाहीर केली आहे. सदर योजनेचा मुख्य उद्देश हा स्वयंरोजगार उभारणीस प्रोत्साहन देण्यासाठी सुलभ तत्वावर भांडवल उभारणी करुन देणे हा आहे. राज्यात राष्ट्रीयकृत बँकां मार्फत सदर योजनेअंतर्गत अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यात येते. यासाठी खादी ग्रामोद्योग आयोग, खादी ग्रामोद्योग मंडळ व जिल्हा उद्योग केंद्र या तीन यंत्रणेमार्फत योजनेची अंमलबजावणी करण्यात येते. राज्य खादी ग्रामोद्योग आयोग, मुंबई सदर योजनेसाठी नोडल एजन्सी म्हणून काम करते.
योजनेअंतर्गत सुविधा उत्पादित उद्योग घटकांना कमाल ₹ २५ लाखापर्यंत तसेच व्यवसाय-सेवा उद्योग घटकांना कमाल ₹ १० लाखापर्यंतचे अर्थसहाय्य बँकामार्फत केले जाते. उद्योग घटकास ५ ते १० टक्के रक्कम स्वगुंतवणूक करावी लागते. बँकेचा कर्ज समभाग ९० ते ९५ पर्यंत असतो.
त्याचप्रमाणे निमशहरी व ग्रामीण भागात अती लहान उद्योगांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करुन त्यांचा विकास साधणे व याद्वारे अधिक रोजगारसंधी व स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजना सुरु करण्यात आली.
जिल्हाध्यक्ष राजेंद्र बापू खरात यांनी नवनीत लोंढे साहेब यांचे अभिनंदन केले पुढे म्हणाले जिल्हात रामदास आठवले साहेब यांच्या नावाने व्हिजन फाउंडेशन यांच्या माध्यमातून उद्योग मेळावा अतिशय मोठ्या प्रमाणात आयोजित केला. नाम.डॉ. रामदास आठवले साहेब हे आपल्या सांगलीचे सुपुत्र असल्याने नक्कीच याचा मोठ्या प्रमाणात कष्टकरी शेतमजूर अनुसूचित जाती जमाती यांना या उद्योग मेळाव्यानिमित्त फायदा होईल. हा उद्योग मेळावा सर्व तालुक्यांमध्ये आयोजित करुन आणि उद्योजक तयार होतील असे यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र (बापू) खरात यांनी सांगितले.
*या कार्यक्रमाचे अतिशय सुंदर सूत्रसंचालन महीला आघाडी खानापूर ता.अध्यक्षा मा.सौ.निकीता तुषार लोंढे मॅडम यांनी केले.*
यावेळी मुस्लिम आघाडी कार्याध्यक्ष ईसाक पिरजादे, महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्षा अश्विनी तोरणे मॅडम, महीला आघाडी तालुका अध्यक्षा सुष्मिता मोटे मॅडम,सांगली जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत कांबळे, मुस्लिम आघाडी खानापूर तालुका अध्यक्ष बशीर भाई मुजावर, रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते भीमराव कदम,खानापूर तालुका उपाध्यक्ष सुरेश कांबळे, उपाध्यक्ष शरद घाडगे, रोजगार आघाडी खानापूर तालुका अध्यक्ष गणेश पवार, महादेव पाटोळे, लेंगरे शाखा अध्यक्ष कांता खिलारे,बोंबेवाडी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष नितीन खरात,
आटपाडी तालुका शहराध्यक्ष शशिकांत मोटे,युवक आघाडी तालुकाध्यक्ष विवेक सावंत,आयटी सेल आटपाडी शहराध्यक्ष मारूती ढोबळे,हर्ष बाबर, यांच्या सह विटा शहरातील विविध संघटनेचे पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

