सुभाष दरेकर जिल्हा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज अहमदनगर- आज दि 25जुलै रोजी अहमदनगर येथे ना बाळासाहेब थोरात, मा महशुल मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते घनःश्याम शेलार यांच्या नगर तालुक्यातील सर्व सामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी नगर तालुक्यातील अनेक गावांतील प्रमुख कार्यकर्त्यांनी घनःश्याम आण्णा शेलार यांना श्रीगोंदा विधानसभेची उमेदवारी साठी नामदार थोरात साहेबांकडे आग्रही मागणी केली भारतात एवढे पुढारी नाही एवढे पुढारी श्रीगोंदा मतदार संघात आहेत तसेच आपण आतापर्यंत चांगल्याप्रकारे सर्व सामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले त्यांच्या सुख दुःखात सहभागी झालात असेच कामे करा भावी म्हणण्याची वेळ च येणार नाही ते आपोआपच घडवून येईल असे प्रतिपादन माजी महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
अहमदनगर येथे मार्केट यार्ड परिसरात घनःश्याम आण्णा शेलार यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
घनःश्याम आण्णा शेलार म्हणाले श्रीगोंदा व नगर तालुक्यात साडेचार वर्षात जनसंर्पकांच्या माध्यमातून चांगली कामे केली. मागील निवडणुकीत श्रीगोंदा तालुक्यात मागे राहिलो मात्र नगर तालुक्यातील ४५ गावानी चांगले लिड दिले. मतदार संघात मी नेत्यामुळे पराभूत झालो मतदारामुळे नाही. यावेळी जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, कॉग्रेस माजी तालुकाध्यक्ष , सपंत म्हस्के, बाबासाहेब गुंजाळ, माजी जिल्हा परीषद उपाध्यक्ष प्रताप शेळके जिल्हा अध्यक्ष स्मितल भैय्या वाबळे, तालुकाध्यक्ष अरुण म्हस्के, श्रीगोंदा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष मनोहर पोटे सरपंच शरद पवार, श्रीगोंदा खरेदी विक्रीचे संचालक भरत भुजबळ बाबा सय्यद पापा पटेल, रमेश ठोबरे, विक्रम कासार, भगवान बोठे, इंदजीत बोठे, तात्या बेरड, मारूती लांडगे, संजय आनंदकर उपस्थित होते..

