नवनिर्वाचित उमेदवार चक्रधर मेश्राम यांचे प्रतिपादन
सर्वधर्मसमभाव तत्वप्रणालीने निवडणुकीचा प्रचार
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क – सिंदेवाही (सावली) आगामी विधानसभा निवडणुकीत धोकेबाजांपासुन सावध राहण्याचे जनतेला आवाहन करित ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचा विकास करण्यासाठी नियोजन करून सातत्यपूर्ण प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणारे नवनिर्वाचित उमेदवार चक्रधर मेश्राम यांनी केले आहे. ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात उमेदवारी मिळण्याचे श्रेय सर्व ज्येष्ठ नागरिक, भगीनी, युवक-युवती आणि विविध सामाजिक, धार्मिक संघटनांना दिले. प्रत्येक गावातील नागरिकांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे मतही चक्रधर मेश्राम यांनी व्यक्त केले. युवक युवतींना विकासाच्या नव्या प्रवाहात आणण्यासाठी रोजगारभिमुख व्यावसायीक दृष्टीकोनातून विविध कौशल्य प्रशिक्षणाचे केंद्र स्थापन करण्यावर भर दिला. रस्ते, विज, पाणी, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण व्यवसाय, उद्योग या समस्या सोडविण्यासाठी कटीबद्ध असल्याचे सांगितले. येणाऱ्या काळात कितीतरी समस्यांना सामोरे जावे लागणार आहे त्यावर मात करण्यासाठी जनतेचे आशिर्वाद मिळत आहे. ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या हितासाठी, सेवेसाठी परिपूर्ण वेळ देऊन तत्परतेने कार्य करण्याची संधी मिळावी. असा जनतेचा आशिर्वाद असल्यामुळेच मला संधी मिळाली आहे. महाराष्ट्रातील युवक आणि जनता महागाईच्या.. बेरोजगारीच्या खाईत लोटवण्यात आली आहे. भाजप प्रणालीच्या सरकारने चुकीचे धोरण सुरू केले आहे. खासगी आस्थापनातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. तो निर्णय रद्द करून चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची भरती ही नियमित वेतन श्रेणीमध्ये करावी,
महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा समाजाने व त्यांचेच वर्चस्व असलेल्या पार्टीच्या नेत्यांनी बहुजन समाजाचा विकास केला नाही आणि होऊ दिला नाही. केवळ ढोर मेहनत, काबाडकष्ट, परिश्रम, शिक्षण, नोकरी, अपार कष्ट यातूनच झाला आहे. राजकीय क्षेत्रातून अजूनही समाजाला विकासात्मक सुविधा, योजना, लाभ मिळाला नाही. आणि तो मराठा नेत्यांनी मिळू दिला नाही. महाराष्ट्रात बहुजन, अल्पसंख्याक समाज एकत्र आला तर केवळ समाजाच्या बळावर सर्व आमदार निवडून येऊ शकतात. म्हणून आज मनुवादी व्यवस्थेचे विचार संपुष्टात आणुन बहुजन समाजाने एकत्र येऊन प्रामाणिक, कर्तव्यदक्ष, दमदार, होतकरू जनहितार्थ सेवा देणाऱ्या उमेदवारांना मोठ्या प्रमाणावर निवडून आणण्याचा तिढा उचलावा. तरच सर्व समाजाचा विकास होईल असे मत ब्रम्हपुरी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असलेले नवनिर्वाचित उमेदवार चक्रधर मेश्राम यांनी आमच्या प्रतीनिधींशी बोलतांना व्यक्त केले.

