शारदा भुयार जिल्हा प्रतिनिधी, वाशिम- कारंजा-मानोरा या मतदार संघावर नेहमीच स्थानिकांपेक्षा बाहेर गावचे पाहुणे ठरणाऱ्या पुढारी यांनी नेहमीच डोळा ठेवून उमेद्वारी मिळवीलेली आहे.परंतु स्थानिक व्यक्तींनाही उमेद्वारी मिळावी अशी अपेक्षा स्थानिक पुढारी आणि मतदार राजाला सुद्धा असते.त्यामुळे अनेक स्थानिक व इतरही पुढार्यांनी गेल्या तिन चार महिन्यांत मतदारांच्या भेटी गाठी वाढवून आपआपल्या पक्षाकडे उमेद्वारीची मागणी केली होती.परंतु आपण पाहिले तर लक्षात येईल की महायुतीमध्ये भाजपा-शिवसेना (शिंदे गट)-राष्ट्रवादी (अजित पवार गट) असे तिन पक्ष समाविष्ट असून तिनही पक्षात इच्छुकांची संख्या मोठी असून मतदार संघात विद्यमान आमदारकी ही भाजपाकडे असल्यामुळे केवळ एकाच पक्षाच्या व्यक्तीला आणि भाजपाला उमेद्वारी मिळणार आहे.तर महाविकास आघाडी मध्येही काँग्रेस शिवसेना (उभाठा)-राष्ट्रवादी (शरद पवार) असे तिन पक्ष असून तिनही पक्षाकडून उमेद्वारीची मागणी होत असून कोणत्याही एका पक्षाला उमेद्वारी दिल्या गेली तरीही उर्वरीत पक्षातील किंवा स्वपक्षातील इच्छुक पुढारी बंडखोरी करण्याची शक्यता आहे. तसेच महत्वाचे म्हणजे इच्छुकांची संख्या असून कुणाची उमेद्वारी त्या त्या पक्षाकडून निश्चित होणार.याचाही तिढा अद्याप पर्यंत सुटलेला नसल्याने, कार्यकर्ते आणि मतदार संभ्रमात पडल्याचे स्पष्ट दिसत आहे. गावगाड्याच्या गप्पा मधून आज या पक्षाला मतदार संघ मिळणार तर उद्या त्या पक्षाला मिळणार. किंवा आज अमुक नेत्याला उमेद्वारी मिळणार तर उद्या त्या नेत्याला उमेद्वारी मिळणार अशा गावगप्पांना ऊत आलेला असल्याचे दिसत आहे.

