आ. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील ११ वर्षांचा कार्यकाळ हा देशासाठी एक सुवर्णकाल असून, ‘संकल्प ते सिद्धी’ हा अमृतकाल ठरत आहे

0
84

मा.खा. डॉ. अशोक नेते यांचे अहेरी मंडलात प्रतिपादन..

अहेरी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – दि. १६ जून २०२५ अहेरी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने ११ वर्षांची यशस्वी सेवा पूर्ण केल्याच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी, अहेरी मंडल तालुक्याच्यावतीने “संकल्प ते सिद्धी” या विशेष जनजागृती अभियानाचे आयोजन आज अहेरी येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सभागृहात उत्साहात पार पडले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोक नेते हे होते. कार्यक्रमास भाजपाचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

मा.खा. डॉ. अशोक नेते यांनी या कार्यक्रमात बोलतांना म्हणाले “पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली देशाने सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या त्रिसूत्रीच्या मार्गावर चालत एक नवीन भारत उभा केला.
‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’ या मंत्रातून जनतेच्या मनात विश्वासाचं नवं पर्व सुरू झालं आहे,” असे प्रतिपादन करत डॉ. नेते यांनी मोदी सरकारच्या ११ वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीवर प्रकाश टाकला.
“मी सलग १० वर्षे लोकसभेत काम करत असताना मोदीजींच्या नेतृत्वाची जवळून साक्ष घेतली. त्यांच्या कर्तृत्वाचा अनुभव घेताना मला संसदेमध्ये देशसेवेचा अभिमान वाटला. हे माझं भाग्य आहे.”
असे पुढे बोलत “ज्या गोष्टी काँग्रेसने ६० वर्षांत पूर्ण केल्या नाहीत, त्या मोदी सरकारने केवळ ११ वर्षांत साकारल्या.”
यामध्ये कलम ३७० हटवणे, तीन तलाक बंदी,सर्जिकल स्ट्राईक,‘ऑपरेशन सिंदूर’,
राम मंदिर उभारणीचा ऐतिहासिक निर्णय,कोरोना काळातील यशस्वी धोरणं
अशा महत्वाच्या कार्यांचा समावेश आहे, असं मा.खा. डॉ. नेते म्हणाले.
“भारताची अर्थव्यवस्था आज जगात चौथ्या क्रमांकावर आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची प्रतिमा भक्कम करणं हे मोदी सरकारचं वैशिष्ट्य आहे.”

मा.खा.डॉ. अशोक नेते यांची खासदारकीतील ठळक विकासकामे : “गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात माझ्या खासदारकीच्या दहा वर्षांत विविध विकास प्रकल्प मार्गी लावले. यामध्ये
रेल्वे प्रकल्प,मेडिकल कॉलेज, सुरजागड लोह प्रकल्प,गोंडवाना विद्यापीठ, कृषी महाविद्यालय, चिचडोह व कोटगल बॅरेज,
एकलव्य विद्यालय,एअरपोर्ट
राष्ट्रीय महामार्ग,यांचा समावेश होतो,” असे त्यांनी यावेळी नमूद केले.

या कार्यक्रमातून केंद्र सरकारच्या विविध योजना व विकास कार्यांची माहिती स्थानिक कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्यात यावी.“हा उपक्रम केवळ माहितीचा नाही, तर कार्यकर्त्यांच्या कृतीला दिशा देणारा प्रेरणास्त्रोत आहे. प्रत्येक गावात मोदी सरकारची कामगिरी पोहोचवण्याचा संकल्प आज आपण घेत आहोत,” असे उद्गार मा.खा. डॉ. नेते यांनी काढले.

या कार्यक्रमास प्रामुख्याने मान्यवर बाबुराव कोहळे ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष, रविंद्र ओल्लालवार प्रदेश कार्यकारिणी सदस्य,प्रकाश गेडाम जिल्हा महामंत्री,प्रशांत कुतरमारे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष,विनोद आकनपल्लीवार जिल्हा उपाध्यक्ष,विकास तोडसाम तालुकाध्यक्ष,अमोल गुड्डेलीवार भाजपा युवा नेते, नगरसेवक विकिस ऊईके, मुकेश नामेवार, शालिनी पोहनेकर, सागर डेकाटे, पोशालु चौधरी, पडशाला महिला व युवा मोर्चा पदाधिकारी, मंडळ संयोजक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here