चंद्रपूर – दि. 24 : प्रधानमंत्री धरती आबा जनभागीदारी अभियानाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या व्यस्ततेमुळे स्थगित करण्यात आला. 25 जून रोजी मुंबईत अतिशय महत्वाच्या बैठकीला पालकमंत्री यांना उपस्थित राहावे लागणार असल्यामुळे सदर कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे.
25 जून रोजी सकाळी 10 वाजता प्रियदर्शीनी इंदिरा गांधी सभागृह, चंद्रपुर येथे “प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान” जिल्हास्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र हा कार्यक्रम आता नंतर घेण्यात येणार असल्याचे प्रकल्प अधिकारी यांनी कळविले आहे.

