
झाली पानगळ सारी
वसंत ऋतु आला
आंबाही पानोपानी
मोहरुन गेला
कोकीळेचा गुंजारव
वाटे कानाला मधुर
इवलीइवली रानपाखरे
लावतात धुंद स्वर
आज या सृष्टीला
नवचैतन्य आले
झाडांना फुटे पालवी
जिकडे तिकडे रंगीत फुले
शिशिराने उधळण केली
रंगबिरंगी फुलांची
द्राक्षे, संत्री मोसंबी
अनेकविध फळांची
सौ सुनंदा बाळासाहेब वाळुंज
ठाणे















