बीड प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
भाजपा कार्यालय महाराष्ट्र राज्य येथून दिनांक ७ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ११.१८ रोजी कॉल आला होता. यावेळी बिजेपि ला आणि लोकसभेला मोदी सरकार ला मतदान कराल का असा सवाल विचारल्या नंतर मि विचारल्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली नाहीत आणि जर परत-परत सत्तेत यायचं असेल तर कष्टकरी शेतकऱ्याला आणि सीमेवर लढणाऱ्या जवानाला जपलं पाहिजे.शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव दिला पाहिजे आणि सीमेवर लढाणाऱ्या जवाणाला भरघोष पगार,पुरती नौकरी आणि पेन्शन दिली पाहिजे.तुमचा शेतकरी सन्मान निधी नको, घरकुल नको, फक्त शेती मालाला हमी भाव, आणि शेतीला पाणी-सिंचन द्या अशी मागणी शेतकरी नेते मा. सम्राट डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी केली. रेकॉर्डिंग नक्की एका, मोदी साहेबाना पुन्हा मतदान करणार का? असा सवाल त्यानी विचारला असता त्यांनी शेकर्यांसाठी काळे काणून कायदे तयार केले होते, मॉल मध्ये एकही रुपया कमी करत नाहीत पण शेकर्यांकडून मातीमोल भावाने त्याचा माल घेता, हॉटेल मध्ये जेवल्यावर प्रतिष्ठा जागी होऊन त्याला टीप देता मग शेतकऱ्यांची भाजी विकत घेतना भाव तोल माप का करता ? तेंव्हा लाज कशी वाटत नाही ? असा संतप्त सवाल यावेळी केला आणि शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव द्या असे विचारले असता त्यांना त्याच उत्तर देता आली नाही कारण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर या सरकारणे काम केल नाही.दुष्काळ पडला आहे, टँकर चालू आहेत, शेतीला आणि पिण्यासाठी पाणी नाही यावर काम केल पाहिजे,मोठमोठी धरण पक्के रस्ते गोर गरिबांसाठी च्या योजना राबविल्या नाहीत आणि जवानांसाठीची जि अग्निविर भरती काढली ती चुकीची आहे, सहा वर्षात जवान काय शिकणार आणि कस देशाच संरक्षण करणार ती भरती रद्द करून आहे तीच चालू ठेवा, जवानांना पेन्शन पाहिजे,त्यांना भरपूर पगार पाहिजे,शेतीच्या योजना प्रभावीपने राबवल्या गेल्या पाहिजेत फक्त धर्मवाद करून एकाच धर्मासाठी काम करून चालणार नाही इथे सर्वधर्म समभाव राबवून संविधानाची मूल्य समता, एकता, बंधुभाव, न्याय,स्वातंत्र्य,सार्वभौम, लोकशाही जपली पाहिजे असा सवाल यावेळी डॉ जितीन दादा वंजारे खालापूरीकर यांनी विचारला……!
नक्की पहा शेतकरी नेते तथा सामाजिक कार्यकर्ते सम्राट डॉ.जितीन वंजारे खालापूरीकर यांनी मोदी साहेबाना मतदान कराल का? असा सवाल करणाऱ्या भाजपा महाराष्ट्र कार्यालय येथील प्रतिनिधी नी विचारलेल्या प्रश्नांना काय उत्तरे दिली….!

