दिपाली पाटील महिला जिल्हा उपसंपादक चंद्रपूर – चंद्रपूर:- श्रीगुरुदेव सेवाश्रम नागपूर अंतर्गत राष्ट्रसंत साहित्य अभ्यास मंडळ द्वारा आयोजित आणि राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेच्या सहकार्याने येत्या १८ आगष्ट २०२४ रोजी (रविवारी) चंद्रपूर जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा निःशुल्क आहे
इयत्ता ८ ते १० च्या विद्यार्थ्यांसाठी निबंधाचा विषय आहे’ गाव हा विश्वाचा नकाशा’ तर इयत्ता ११ते १२च्या विद्यार्थ्यांसाठी निबंधाचा विषय आहे’ ग्रामगीतेतील आदर्श जीवनमुल्ये संबंधित विद्यार्थ्यांनी दिलेल्या विषयावर एक हजार शब्दांचा निबंध प्रत्यक्ष केंद्रावर येऊन लिहायचा आहे. सदर निबंध स्पर्धा ताडोबा मार्गावरील मातोश्री विद्यालय तुकुम येथे दि.१८/०८/२०२४ रविवारी रोज दुपारी ११ ते २ या वेळात होणार आहे.
सहभागी सर्व स्पर्धकांना आकर्षक प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. उत्तम निबंध लिहिणाऱ्यां स्पर्धकांतून खालील प्रमाणे विजेते निवडले जाणार आहे. पारितोषिके प्रत्येक गटास पुढीलप्रमाणे देण्यात येतील.
प्रथम पारितोषिक रु. १५००, द्वितीय पारितोषिक रु. १०००, प्रोत्साहन पारितोषिक रू. ५०० चे ४ देण्यात येणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन
राष्ट्रसंत साहित्य अभ्यास मंडळ चे अध्यक्ष डॉ. बाळ पदवाड यांनी केले आहे. जिल्हास्तरीय मुख्य आयोजन समितीची सभा घेण्यात आली त्यावेळी समन्वय समितीचे प्रा. नामदेव मोरे घुग्घुस ,एड. राजेंद्र जेनेकर राजुरा,डॉ. श्रावण बानासुरे बल्लारपूर ,डॉ. धर्मा गावंडे सावली, नामदेव पिज्दूरकर मुल, अभय घटे, बंडू टेकाम, कार्तिक चरडे, मनोज ठेंगणे, चंद्रपूर, देवराव कोंडेकर, चंद्रपूर
श्रीमती रोहिणी मंगरूळकर, रिया पिपरीकर, सरोज साहू, कोमल बावरे, श्रध्दा कुमरे आदींची उपस्थिती होती.

