prabodhini news logo
Home ठळक बातम्या भारतीय स्वदेशी काँग्रेस पार्टी महाराष्ट्रात लढणार विधानसभा निवडणुक

भारतीय स्वदेशी काँग्रेस पार्टी महाराष्ट्रात लढणार विधानसभा निवडणुक

0
187


आमची युती जनतेशी, महाराष्ट्राला नंबर १ च राज्य बनवू; पूनम गुप्ता यांचा शब्द

सोनाली घाटगे महिला उपसंपादक प्रबोधिनी न्यूज पुणे : उत्तर प्रदेश, हरियाणा, तेलंगणा आदी राज्यांमध्ये निवडणुका लढवल्यानंतर भारतीय स्वदेशी काँग्रेस पार्टी महाराष्ट्रात पक्षाच्या वतीने निवडणूक लढवण्यास सज्ज झाली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा पुनम गुप्ता उर्फ दीदीश्री आणि पक्षाचे राष्ट्रीय सचिव सम्राट करवा यांनी याबाबत पुण्यात पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. महाराष्ट्रात सध्या सर्वच पक्षांची खिचडी झाली आहे; त्यामुळे एक नवा पर्याय म्हणून आम्ही महाराष्ट्रात विधानसभेच्या जास्तीत जास्त जागा लढवण्याचा प्रयत्न करणार आहोत आम्हाला खात्री आहे आमच्या पक्षाला महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळेल असं पुनम गुप्ता यांनी सांगितले. शिक्षण आणि आरोग्य या दोन क्षेत्रांमध्ये प्रामुख्याने पक्ष लक्ष देणार आहे याशिवाय महाराष्ट्रातील आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी पक्ष प्रयत्न करेल अशी माहिती सम्राट कारवा यांनी दिली आहे. महाराष्ट्रातील तरुणांना पक्षात सामील होण्याचा आवाहनही त्यांनी केले.

पूनम गुप्ता महणल्या, भ्रष्टाचाराच्या या खेळामुळे निवडणुका अत्यंत महागड्या झाल्या आहेत आणि खऱ्या जननेत्यांना सध्याच्या निवडणूक प्रक्रियेत स्थान मिळालेले नाही. त्यामुळे आम्ही खऱ्या जननेत्यांची निवड करण्यासाठी, सर्व नागरिक, खरे नेते, विविध क्षेत्रातील तज्ञ यांचे स्वागत करण्यासाठी या पक्षाची ‘भारतीय स्वदेशी काँग्रेस’ (BSC) महाराष्ट्रात देखील गुप्त केली आहे. जे इच्छुक आहेत की राजकारणात सामील होऊन देशाच्या खऱ्या घटनात्मक, लोकशाही मूल्यमानांचा पाठपुरावा करण्यासाठी हात मिळवून एकत्र येण्याचाठी भारतीय स्वदेशी काँग्रेस पक्ष आपले ध्येय आहे आणि BSC मध्ये आम्ही तुम्हाला खात्री देतो की आम्ही ज्ञान, अनुभव, देशभक्ती, नैतिकता आणि व्यावसायिक विकासाच्या मूल्यांसाठी समर्पित आहोत. आमच्या महाराष्ट्र राज्यात प्रचंड क्षमता आहे त्याचा पुरेपुर वापर करुन महाराष्ट्राला देशात क्रमांक १ चे विकसित राज्य करु.

भारताच्या प्रत्येक नागरिकासाठी नागरिक सशक्तीकरण, सन्मान आणि प्रतिसाद मिळविण्यावर BSC मुख्यतः लक्ष केंद्रीत करेल आणि हे सुनिश्चित करेल की प्रत्येक गावातील शेवटच्या व्यक्तीला योग्य रोजगार, व्यवसाय, शिक्षण सुविधा, स्वदेशी व्यवसायासह तसेच आनंदी, निरोगी, न्यायसंगत आणि सुरक्षित जीवन जगता येईल. भारताच्या संविधानानुसार स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. आगामी सत्रांमध्ये आपल्या उदिष्टांना साध्य करण्यासाठी आम्ही कोणत्या प्रक्रिया आणि पद्धती अवलंबतो याची माहिती यावेळी राष्ट्रिय सचिव सम्राट करवा यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here