बीड प्रतिनिधी:- दर वर्षी प्रमाणे या वर्षी पण सम्राटपुत्र राजरत्न डॉ. जितीन वंजारे याचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून जोरदार अभिष्टचिंतन सोहळा पार पाडला.ह्या सोहळ्याच मुख्य आकर्षण जेतवन बुद्ध संस्कार केंद्र पैठण चे व्यवस्थापक भंते आनंदजी हे होते. त्यांनी बुद्धाच्या मार्गाने गेल्यास जीवनात होणारे अमुलाग्र बदल, साधू संतांची वारकरी परंपरा आणी भारतीय प्राचीन बुद्ध भिक्खू संघाची कार्य प्रणाली सांगितली, भगवान गौतम बुद्धाच सम्यक ज्ञान सांगून संत तुकोबानी पण बुद्धाच्या विचाराचा अवलंब कसा केला तेही सांगितले त्याच बरोबर आज यद्धाची नाही तर जगाला बुध्दाची गरज आहे. मानवता प्रज्ञा शील करुणा यावर ज्ञान दिल.भगवान बुद्धाची त्रिसरण पंचशील आणी अष्टांग मार्ग सांगितले, महामानावंचे विचार सांगितले डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या मानवतेच्या गोष्टी सांगितल्या. एकंदरीत सर्व विधिवत पूजा करून नंतर केक कापला. यावेळी कार्यक्रमाला पाथर्डी प. स. माजी सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य पैलवान गहीनाथ दादा सिरसाठ, त्यांच्या पत्नी माजी सरपंच सिरसाठ, टाकळी गावच्या सरपंच किसवे ताई, गाडे ताई, चव्हान ताई, मच्छिन्द्र मानकर मामा, शेषेराव आप्पा गाडे,आप्पा शिरसाठ,आरोग्य कर्मचारी गाडे साहेब,उद्योजक वस्ताद भरत जाधव,भगवानभाऊ गर्जे,शुभम गांधी, श्रीमंत शिरसाठ,गोटूकाका गांधी, इसाक भाई, मुख्तर भाई, गोविंद चव्हाण,बाबासाहेब ढाकणे, विशाल काळे,संदीप बारगजे,उगले फिटर, स्नेहा वंजारे, सीमा वंजारे, संजीवनी वंजारे आदींसह समस्त ग्रामस्थ टाकळी मानूर उपस्थित होते.
यावेळी जी प सदस्य गहीनाथदादा सिरसाठ यांनी राजरत्न ला भावी आयुष्याच्या वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.गावात चांगल्या आरोग्य सेवेबद्दल डॉ जितीन वंजारे यांचं कौतुक केल. शिंदे मामा, शुभम गांधी, सिरसाठ ताई यांनी शुभेच्छा दिल्या आणी कार्यक्रमाचे आभार डॉ जितीन वंजारे यांनी मानले.

