
रमाई किती कठीण होते
तूमचे कष्ट
कपडे घर दागिण्यांसाठी
कधीच नव्हता हट्ट
हळवा सोशिक संयमी
स्वभाव तूमचा साधा
तूमच्यामुळेच बाबासाहेब
झाले सामाजिक योद्धा
तूमचं स्व: तासाठी जगणं
नव्हतच कधी
तूम्ही दिली आम्हा
निर्भिड जगण्याची संधी
रमाई खुप मोठं आहे
तूमचं योगदान
तूम्ही होतात म्हणून
बाबासाहेबांनी लिहीलं संविधान
रमाई तूम्ही होतात म्हणून
बाबासाहेबांना होता आधार
तूम्ही होतात म्हणून
बहुजनांचा झाला उद्धार
कवयित्री वैशाली वागरे – भुक्तरे
नांदेड














