खेडले ग्रामसेवकांचा व झेरॉक्स उपसरपंचाचा गजब कारभार

0
362

चुकीच्या प्रकाराबद्दल आवाज उठवल्याने तक्रारदाराला धमक्या

संदीप अवधुत दिंडोरी प्रतिनिधी – ग्रामीण भागात आदिवासी व गोरगरीब कुटुंबाला घरकुल देण्यात येते. विशेष म्हणजे जागा नावावर नसल्यास ग्रामपंचायत त्याला मोफत जागा मिळवून देखील देते. परंतु दिंडोरी तालुक्यातील खेडले येथील ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकांनी चक्क घरकुल लाभार्थ्यांकडून जागेच्या मोबदल्यात सात हजार रुपये घेतल्याने एकच आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्याविरुद्ध आवाज उठवल्यावर ग्रामसेवकांच्या ती चूक अंगलट येण्याची शक्यता असल्याने त्यांनी ते पैसे परत दिले.‌ परंतु हे करत असताना तक्रारदाराला चक्क धक्काबुक्की व धमक्या देण्याइतपत मजल ग्रामसेवकाची होते आणि त्याला साथ विद्यमान उपसरपंचांचे पती यांच्याकडून दिली जाते. झेरॉक्स उपसरपंच व ग्रामसेवकांच्या मनमानी कारभाराला आळा बसण्यासाठी संबंधितांवर कारवाई व्हावी अशी मागणी परिसरातून होत आहे.

सविस्तर वृत्त असे की, दिंडोरी तालुक्यातील खेडले येथे ग्रामसेवकांनी चक्क गावठाणाची जागाच विकून टाकली. प्रधानमंत्री घरकुल योजनेत अनेक लाभार्थींना स्वतःची जागा नसल्यामुळे घरकुला पासून वंचित राहावे लागते. परंतु याच गोष्टीचा फायदा घेत ग्रामसेवक आणि लोकप्रतिनिधी जनसामान्यांची लुट करत असतात तसाच काहीसा प्रकार दिंडोरी तालुक्यातील खेडले ग्रामपंचायत येथे झाला आहे. या ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक यांनी सात हजार रुपये घेऊन घरकुल लाभार्थ्यांना सामान्य पावती देत जागा विकल्याचा गजब कारभार समोर आला आहे. सदरील जागा ही गावठाणची असून या जागेचा सर्वस्व अधिकार हा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना असतो परंतु खेडले ग्रामपंचायतचे ग्रामसेवक स्वतःला मुख्य कार्यकारी अधिकारी तर समजत नाही ना ? असा देखील प्रश्न उपस्थित राहतो. यासंदर्भात स्थानिक ग्रामस्थ आणि सरपंच यांचा देखील नकार असताना ग्रामसेवक व उपसरपंच यांचे पती यांनी हा कारभार केल्याचं सरपंच व ग्रामस्थ यांनी आरोप केला आहे. वास्तविक सरपंच ग्रामसेवक यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जि प यांच्याकडे अठरा लाभार्थ्यांना जागा नसल्याने जागा मिळणे बाबत कायदेशीर प्रस्ताव पाठवला. सदरील प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर जागा देणे योग्य आहे परंतु प्रस्ताव मंजूर होण्या आधीच सरपंच यांना माहिती न करता ग्रामसेवक यांनी घरकुल लाभार्थ्यांना बेकायदेशीर जागा विकली. या बाबत सरपंच उषा वाघ यांनी अधिक माहिती दिली तर नाराजी व्यक्त करत तक्रारदार यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली सदरील तक्रारीत ग्रामपंचायत अधिकारी बागुल यांनी अनियमितता करत गावठाणची जागा मुख्यकार्यकारी यांची परवानगी न घेता परस्पर विकल्याचे तक्रारीत नमूद केले. याला पंचायत समिती मधील काही अधिकाऱ्यांचा वरदहस्त आहे की काय अशी नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली.
ही प्रक्रिया आपल्या अंगलट येणार याचे जाणीव ग्रामसेवकांना झाल्याबरोबर त्यांनी घेतलेले पैसे परत देण्याची तजवीज घेतली. परंतु चुकीच्या पद्धतीने प्रशासकीय अधिकारीच गोरगरीब व आदिवासी कुटुंबावर अन्याय करीत असतील तर जाब मागावे कोणाकडे असा प्रश्न तयार होतो. झालेली चुक प्रशासनाकडे कबूल करण्याऐवजी हे ग्रामसेवक महाशय गावात पत्रकार परिषद घेत जाहीरपणे खाद्या राजकीय पुढार्‍यासारखे वक्तव्य करतात. यावर गटविकास अधिकाऱ्यांनी आक्षेप घेत संबंधित ग्रामसेवकाने कर्मचारी आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी संबंधितावर कारवाई करणे अपेक्षित आहे.

चौकट
तक्रारदार – आम्ही गावातील वैयक्तिक कोणत्याही व्यक्तीची कारवाई न करता आम्हाला बौद्धविहाराची जागा आम्हाला मिळावी म्हणून मा मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प यांच्याकडे लेखी तक्रार केली परंतु ग्रामसेवक बागुल यांचे पितळ उघडे पडले व प्रकरण अंगलट आल्याने त्यांनी तक्रारदार रवींद्र शेळके यांना धक्काबुकी केली हे निंदनीय आहे शासकीय कर्मचारी हे सामान्य नागरिकांना न्याय न देता त्यांच्यावर दबाव आणतात हे असंविधानिय बाब आहे यावर गटविकास अधिकारी यांनी तात्काळ कारवाई करावी अन्यथा आम्ही आमरण उपोषण करू याची दक्षता घ्यावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here