कारंजा लाड प्रतिनिधी – भारत देशाची शान भारतीय संविधान आणि त्या संविधानामध्ये धार्मिक स्वातंत्र्य तसेच भारत देश “धर्मनिरपेक्ष” या देशामध्ये विविध उत्सवांना महत्व दिले जाते हिंदू समाजामध्ये दिवाळी दशहरा होळी तर मुस्लिम समाजामध्ये रमजान ईद ईद-ए-मिलादुन्नबी तसेच बकरी ईद हे महत्त्वाचे उत्सव अति आनंद उत्सवात साजरे केले जातात तसेच हे उत्सव खुशहाली घेऊन येतात , ईद लोकांमधील अंतर दूर करते, ईद उत्सवानिमित्त समाजातील अनुयायी सर्व एका ठिकाणी येऊन रंगीबेरंगी कपडे परिधान करून मुस्लिम नागरिक अल्लाह चे इबादत म्हणजे नमाज अदा करण्याकरिता स. 80.00वाजता बायपास जवळील ईदगाह मैदानावर ईदगाह परिसरात सामूहिक नमाज सकाळी 8:45 वा. अदा करण्यात आली, दरवर्षीप्रमाणे यावर्षी शसुद्धा कश्यप बंधूच्या वतीने वझू करण्यासाठी व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली, ‘ईद ही ईश्वराची अनोखी भेट आहे, आपल्या घरी आनंद नांदो,”ईद-उल- अज्हा” हा इस्लामचा मुख्य उत्सव आहे, हा सण जगभरातील मुस्लिम बांधव मोठ्या उत्साहात साजरा करतात.
“काज़ी-ए-शहर” काज़ी मोहंमद जाकीर यांनी ईदगाह वर उपस्थिती देऊन सर्व मुस्लिम बांधवच्या गळाभेट देऊन ‘ईद मुबारक’ शुभेच्छा दिली आणि ईदगाहची शान वाढवली..
सोबतच युसूफ सेठ पुंजानी यांनी सुद्धा सर्वाना गळाभेट देऊन ईद ची शुभेच्छा दिली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये किंवा अफ़वा जाऊ नये म्हणून करिता जिल्हा पोलिस अधीक्षक अनुज तारे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाडवी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक दिनेशचंद्र शुक्ला यांनी अतिरिक्त पोलिस दल पाचरण करून चोख पोलिस बंदोबस्त तैनात केला होता..

