वादळी पावसामुळे मौजा – किलोनी येथील जल शुद्धीकरण संयंत्र उडाले.

0
32

प्रणाली येरपुडे विशेष जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर – भद्रावती तालुक्यातील, काढ़ोली ग्रामपंचायत अंतर्गत येणार्या मौजा किलोनी येथे 09 में 2025 रोजी रात्रि 12.00 वाजताच्या दरम्यान झालेल्या वादळी वार्यामुळे व पावसामुळे मौजा किलोनी येथील DFU फ्लोराईड रिमुव्हल युनिट (जलशुद्धीकरण संयंत्र) संपूर्ण उडून गेल्यामुळे जलशुद्धीकरण संयंत्राचे खूप मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे गावातील नागरिकांना पिण्याच्या

शुद्ध पाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

जिल्ह्यात ठिकठिकाणी ग्रामीण भागात झालेल्या वादळ वार्याचा व पावसाचा जोरदार

तडाखा बसला असून अनेक झाडे व अनेकांच्या घराच्या छतावरील पत्रे उडून गेल्याने भद्रावती तालुक्यातील नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here