“वडाला फेरे मारण्यापेक्षा,पुढच्या पिढीला जगविण्यासाठी, महिलांनी वटवृक्ष लावून वटपोर्णिमा साजरी करावी.” – संजय कडोळे

0
72

शारदा भुयार वाशिम जिल्हा प्रतिनिधी – वाशिम: वड,पिंपळ, कडूलिंब, औदुंबर अशी महत्वाची वृक्ष नेस्तनाबूत होऊन, वनसंपत्ती नष्ट झाल्याने आणि पर्यावरणाचा ऱ्हास झाल्यामुळे, मानवी जीवनावर महासंकट ओढवले जात असून, पृथ्वीवरील जल (पाणी), प्राणवायू (ऑक्सिजन) संपुष्टात येत असून, त्याची कमतरता जाणवत असल्यामुळे आज निरनिराळ्या भयंकर रोगांची उत्पत्ती होऊन प्रत्येक रुग्नाला नैसगीक प्राणवायू मिळत नसल्याने, ऑक्सिजन सिलेंडर मधून कृत्रीम प्राणवायू देण्याची वेळ आपल्यावर येत आहे. किंवा प्राणवायू मिळत नसल्याने दररोज शेकडो लोकांचे अकाली मृत्यु होत आहेत.हीच परिस्थिती कायम राहीली तर प्रत्येक मानवाला जगण्यासाठी कृत्रिम ऑक्सिजनचे सिलेंडर विकत घेऊन जगावे लागेल. व दररोज, दर तासाला नव्हे नव्हे दर क्षणाला त्याला कृत्रिम ऑक्सिजन मिळाला नाही तर तात्काळ मृत्युच्या जबड्यात जावे लागेल.व आपली मुले, नातवंड, पतवंड प्राणवायू अभावी जीवंत राहणारच नाहीत. शेवटी एकदिवस सृष्टीमध्ये अख्ख्या मानवी जीवनाचे अस्तित्वच नष्ट होऊन पृथ्वी विरान वाळवंट होईल. हे एक महाभयंकर असे कटूसत्य आहे.त्यामुळे आता यापुढे आपली पुढची पिढी म्हणजे मुलं-मुली, सुना नातवंड पतवंड यांनी जीवन जगावे. त्यांनादेखील जग बघता यावे.
यासाठी आपण सर्वांनी, प्राणवायू (ऑक्सिजन) देणाऱ्या वृक्षांचे वृक्षारोपन आणि संवर्धन केले पाहिजे. त्यासाठी प्रत्येक महिलांनी वटपोर्णिमेला, आपल्या घराच्या परिसरात वटवृक्ष,वड, पिंपळ, औदुंबर, कडूलिंब अशी शे-पाचशे वर्षापर्यंत जगणारे वृक्ष लावून आपल्या मुला मुली नातवंडाला जगविण्याचे वरदान निसर्गाला मागीतले पाहिजे व वटपोर्णिमा साजरी केली पाहिजे. असे आवाहन, वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथील, निसर्ग प्रेमी पर्यावरण मित्र संजय कडोळे यांनी केले आहे. वटपोर्णिमे संदर्भातील अधिक वृत्त असे की, पौराणिक काळामध्ये सतीने आपल्या पती सत्यवानाकरीता, वटवृक्षाखाली, वडाला सात फेरे मारून, निसर्गाकडून वरदान मिळवून, आपल्या पातिव्रत्याने, यमराजाकडून सत्यवानाचे प्राण परत आणले होते. आणि याच वटवृक्षाखाली प्रत्यक्ष यमराजाकडूनच आपल्या सौभाग्याचे, जन्मोजन्मी सात जन्मोपरांत हाच पती मिळवून, अखंड सौभाग्यवती होण्याचे वरदान मिळवीले होते.ती स्मृती निरंतर जपून सौभाग्यासाठी महिला मंडळी ह्या वटपोर्णिमा साजरी करत असतात. उल्लेखनिय म्हणजे त्याकाळी ज्याप्रमाणे सतीने आपल्या पतीसाठी वरदान मागीतले.तसेच आजच्या महिलांनी, त्यांची मुलं मुली, नातवंड, पतवंड यांना त्यांचे संपूर्ण आयुष्य जगता यावे. पृथ्वीवरील मानवाचे अस्तित्व अबाधित राहावे.यासाठी वटपोर्णिमा साजरी करून, वरदान मागीतले पाहिजे. आणि त्याकरीता वटपोर्णिमेला प्रत्येक महिलेने आपल्या घराचे परिसरात वडाचे किंवा पिंपळ, कडूलिंब, औदुंबर यापैकी एका वृक्षाचे रोपण करून संवर्धन केले पाहिजे व मानवी अस्तीत्वाचे जीवन अमर केले पाहिजे. आज (मुला नातवंडांना जगविण्यासाठी) पुढच्या पिढीसाठी, धनसंपत्तीचा नाही तर पर्यावरणातील प्राणवायू (ऑक्सिजन) देणाऱ्या वृक्षसंपत्तीचा साठा करण्याची वेळ आली असल्याने, वृक्षलागवडीने वटपोर्णिमा साजरी करण्याचे आवाहन निसर्गप्रेमी, पर्यावरण मित्र संजय कडोळे यांनी महिलामंडळीसाठी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here