निष्क्रिय नगरपरिषदेच्या विरोधात महिला काँग्रेसचा “थोडी चुडिया पहेन लो” आंदोलन

0
74

घुग्घूस प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क : नवीन लग्न झालेल्या नवविवाहितेच्या हातात लग्नाची मेहंदी व लग्नाच्या बांगळ्या असतात व नवीन नवलाईचे दिवस असतात त्यामुळे ती काही दिवस घरातील काहीच काम करीत नाही.

शहरात सहा ते आठ महिन्यापूर्वी रुजू झालेले नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांची नवलाई संपली नसून त्यांचे लक्षण ही नवविवाहिते सारखे असल्यामुळे ते शहरातील काहीच काम करीत नसल्याने शहरातील संतप्त महिलांच्या वतीने काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 19 जून रोजी दुपारी 01 वाजता नगरपरिषदेच्या विरोधात “थोडी चुडिया पहन लो आंदोलन’ करण्यात येत असून यासंदर्भात आज दिनांक 16 जून रोजी महिला काँग्रेस तर्फे नगरपरिषद व पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले

याप्रसंगी महिला जिल्हा उपाध्यक्ष यास्मिन सैय्यद, जिल्हा महासचिव पदमा त्रिवेणी, महिला शहर अध्यक्ष संगीता बोबडे, मंगला बुरांडे, शिल्पा गोहिल, मिरा पुसाटे, प्रतिभा वासेकर, अश्विनी धुर्वे, आयेशा शेख, चंदाताई दुर्गे, कल्पना लोणे, दुर्गा आत्राम,संगीता गेडाम, वंदना उमाटे, जोया शेख,सिमा उमाटे, व मोठ्या संख्येने महिला उपस्थित होते.

नगरपरिषद हे शहर वासियाकडून पाणी कर व गृहकर नियमितपणे घेतात आता तर गृहकरावर व्याज ही घेत आहेत.
नागरिकांनी जर टॅक्स भरले नाही तर जन्म मृत्यूच्या दाखल्यापासून तर रहवासी दाखला ही देत नाहीत नागरिकांची अडवणूक करतात.
नगरपरिषदेच्या खालील निष्क्रिय कारणाच्या विरोधात आंदोलन छेळण्यात येत आहे.

आंदोलनाचे प्रमुख कारण

1) गेल्या तीन वर्षांपासून महिला काँग्रेस तर्फे मोकाट कुत्र्यांचे व्यवस्था करण्यासंदर्भात निवेदने व विनंती करण्यात येत असतांना देखील मुख्याधिकारी यांच्या बेजबाबदार वृत्तीने
याप्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याने मोकाट कुत्र्यांनी तीन वर्षीय बालकासह 65 वर्षीय महिलेवर तसेच अनेक नागरिकांवर जीवघेणा हल्ला केला आहे.
व हल्ले निरंतर शुरुच आहे.

2) शहरात बारा महिने पर्याप्त पाणी असणारी वर्धा नदी आहे
मात्र घुग्घूस शहर नगरपरिषदेच्या बोगस कारभारामुळे सदैव तहानलेलाच असतो शहरातील अनेक भागात नागरिकांच्या नळाला पाणी येत नाही.
नळ येण्याचा तर काही वेळच नाही कधी रात्री येतो?तर कधी भर उन्हात दुपारी? तर कधी भलत्याच सकाळी नळा साठी महिलांना घरातच रहावे लागते.
आणि महत्वाचे दोन- दोन,तीन – तीन दिवस नळच येत नाही.
वॉटर टँकरने तोंड पाहून पाणी देतात
व पाण्यासाठी महिलांना पैशे ही मागतात.

3) शहरातील अमराई ते आंबेडकर नगर अकरा प्रभागापैकी अनेक भागात नाल्याच नाही तसेच उपलब्ध असलेल्या नाल्यांची व्यवस्थित सफाई करण्यात येत नाही.
नाल्यातून काढलेला कचरा त्याच ठिकाणी टाकून ठेवतात एक एक आठवडा उचलण्यात येत नाही त्यामुळे सर्वत्र घाण पसरून नागरिक आजारी पडतात

4) वेकोलीच्या रामनगर इंदिरा नगर येथे कचरागाडी जातात मात्र वेकोलीच्या शास्त्री नगर कॉलनीत कचरा उचलण्यासाठी घंटागाडी पाठविल्या जात नाही.
यापरिसरातील वॉटर ए.टी. एम (ATM) अनेक दिवसापासून बंद आहे
तक्रारी नंतर ही भिषण पाणी टंचाईच्या काळात वॉटर ATM बंद असून अजून पर्यंत वॉटर ATM शुरु करण्यात आला नाही.
या शास्त्री नगर व शालिकराम नगर या वस्तीकडे सतत दुर्लक्ष करीत आहे.

5) शहरात जागोजागी पथ दिवे बंद असून अंधारामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होत असते मात्र यागंभीर विषयाकडे ही सतत दुर्लक्ष केला जातो.

6) शहरातील अनेक भागात विशेषतः वॉर्ड क्रं 06 मधील साई नगर, तेगीया नगर, लूंबिनी नगर यासह अन्य वस्तीत नागरिकांना घरापर्यंत जायला रस्ताच उपलब्ध होत नाही
पावसाळ्यात तर परिस्थिती अंत्यन्त बिकट होत असते
मात्र नगरपरिषदेला या समस्याचा काहीच घेणे देणे नाही.

7) नगरपरिषदेचे काम आठवड्यात पाच दिवस चालतो मात्र मुख्याधिकारी रंजनकर यांचा पत्ताच नसतो ते कार्यलयात सकाळी 11 वाजता येत नसून आपल्या मर्जीने दुपारी येतात
यामुळे नागरिकांना यांची तासन तास वाट पाहावी लागते

8) मुख्याधिकारीची दुटप्पी भूमिका!

नगरपरिषदेचे मुख्याधिकारी हे शासकीय अधिकारी असून त्यांची भूमिका हे निष्पक्ष असायला हवी मात्र मुख्याधिकारी हे निष्पक्ष नसून हे कारवाईत भेदभाव करतात.
नुकतेच शहरातील राजकीय पक्षाच्या होर्डिंग्ज नगरपरिषदे कडून सक्तीने काढण्यात आले मात्र याप्रक्रियेत सत्तापक्षाचे बॅनर काढण्यात अंत्यन्त वेळ काढूपणा केला.

नगरपरिषद मुख्याधिकारी व अधिकारी यांना त्यांच्या कर्तव्याचा विसर पडल्या मुळे निष्क्रिय मुख्याधिकारी व नगरपरिषदे विरोधात महिला काँग्रेस तर्फे जाहीर निषेध आंदोलन करण्यात येणार आहे.
हा आंदोलन काँग्रेसचा नसून शहरातील समस्याबाबत असल्यामुळे नागरिकांनी व माता भगनींनी जास्तीत – जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन महिला नेत्यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here