
माझ्या अंधाऱ्या आयुष्यात
लावला ज्ञानाचा दिवा
शिक्षण दिले मज
अनमोल हा ठेवा.
वाटले तरी संपत नाही
कितीही घेतले तरी मन भरत नाही
गुरु तुम्ही खरे शिल्पकार
मन माझे भरुन जाई
ज्ञान घेतल्याने होते
माणसाची प्रगती
घेणार नाही त्याची
होते अधोगती.
संस्कार आणि ज्ञान देऊन
माणसाला सुधरविले
शिक्षणाचे भांडार केले
आमच्यासाठी खुले.
सौ. सुनंदा बाळासाहेब वाळुंज ठाणे















