
जाती धर्म आणि पंथ
अस्पृश्यता, विषमता
समाजामध्ये होती
विषासारखी कटुता
लोकशाही कारभार
मार्गदर्शक तत्वांनी
व्हावा हीच एक जिद्द
ठेवली भिमरावांनी
लोकहितवादी होते
साऱ्या जनमानसात
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे
कलम संविधानात
घटनेचे शिल्पकार
असे जगात महान
संविधान संशोधक
भिमरावालाच मान
सौ सुनंदा बाळासाहेब वाळुंज ठाणे















