
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – चंद्रपूर: ६९ व्या राष्ट्रीय शालेय बुद्धीबळ स्पर्धेत महाराष्ट्राच्या १७ वर्ष गटाच्या मुलींच्या संघाने सुवर्णपदक जिंकले. मुलांच्या संघाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. स्पर्धेचे आयोजन त्रिपूरातील आगरताळा येथे करण्यात आले होते.
विजेत्या महाराष्ट्र संघात नागपूर ची बुद्धीबळपटू श्रद्धा बजाज, हिच्या सह सानी देशपांडे( छत्रपती संभाजीनगर), श्रेया हिप्परगी (सांगली), सई पाटील( पूणे), आणि वैष्णवी मानकर नंदूरबार यांचा, तर मुलांच्या कास्य संघ विजेत्यात निहान पोहाने (चंद्रपूर),आरूष चित्रे (नागपूर ),हर्ष गाडगे( छत्रपती संभाजीनगर), मानस गायकवाड (सोलापूर),आणि अथर्व सोनी (ठाणे), यांचा समावेश होता.
महाराष्ट्र संघाची तयारी आणि प्रशिक्षण शिबिर नागपूरात झाले. प्रभारी उपसंचालक आणि जिल्हा क्रिडा अधिकारी पल्लवी धात्रक यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले.















