
कधी रुसलो कधी हसलो
लाविले होते मायेचे रोप
काही साध्य काही असाध्य
देतो मात्र सरत्या वर्षाला निरोप
काव्यपंक्तीच्या दुनियेत
रोजचा भरला होता मेळा
शेरोशायरीने माझ्या
सुंदर शब्दांचा झालाय मळा….
सुसंस्कारित वचनांनी
आयुष्याला जोडली नाती
कानाफुशीच्या विकारी बाणांनी
मानवतेची केली आहे माती….
नवे मित्र नवीन नाती
नवीन गीत सप्तसुरांचे
भावभावनांच्या मांदियाळीत
नाते आपुलकीच्या माणसांचे…..
निरोप सरत्या वर्षाला
बोध घेतलाय नव संजीवन
नवीन पालवी अंकुरेल
साज येईल हे निर्मल मन….
$गायकवाड मनोज रामचंद्र
शहापूर जिल्हा ठाणे ©















