
सांजवेळी अस्तास जाता जाता
पित केशरी किरणे सांडत होता
पश्चिमेला डोंगर उतरत होता
आकाशीचा राजा मावळत होता
होता सकाळी तो घेऊन आला
भरभरून सोनेरी तेजस्वी किरणांना
चैतन्याचा अनमोल खजिना
जीवनास जगणे शिकवताना
नभही घेतो त्याचीच ओढून आभा
निसर्ग, पशु,पक्षांना जीवनाची तृषा
श्वासांत चेतना तरंग उठवून आशा
जागृत सकारात्मक होते जीवन मनिषा
जातानाही ठेवून सारी आभा
दिप आशेचा सारा उजळला
जाऊन येईन पुन्हा उद्या मी
एक ज्योत तेववून रवि मावळला.
डाॅ. सौ.स्मिता सदानंद मुकणे
ठाणे















