
वसंत ऋतू हळूच येता
बहरला शिवार सारा
नव्या आशेचा अंकूर फुटला
सुटला थंडगार वारा…..!!
आल्हाददायक झाले वातावरण
प्रसन्नतेचे उगवले किरण
झाडे,वेली,बहरून आली
मदमस्त झाले वातावरण…..!!
वसंत ऋतूची चाहूल लागता
कळी कळी सर्व खुलली
गुलाबाच्या गाली,लाली
सुगंधात ती सर्व न्हाली…..!!
अदृश्य झाली धुक्याची चादर
तेजोमय सुर्य किरणांनी
फुलली जाई, जुई,चमेली
मोगराही दरवळला अंगणी….!!
सौ रंजनाताई आटे
जिल्हा वर्धा















