
तरूणांच्या बलिदानाने
थरथरत्या लाहोर जेलच्या भिंती
जनतेचा महापूर लोटला
जेलच्या अवती भवती
तो अन्यायी ब्रिटिश काळ
स्वातंत्र्याचा कर्दनकाळ
आले इंग्रज व्यापारास
जखडले पाशात मातैस
गुलामीचे साखळदंड
झाले संस्थानिक जेरबंद
कायम धारा पद्धतीने
झाले शेतकरी अंदाधुंद
झाले जागे जन मन
उठले पेटून एक होऊन
सत्याग्रहाची कास धरून
ब्रिटिशांना केले निशाण
चले जावचा लावून नारा
जागविला स्वदेश सारा
वाढले अन्याय जुलुम
जालियनवाला बागेत केले अमानुष हनन
नव्हती सीमा क्रुरतेची
निरपराध्यांच्या हत्येची
अश्याच लाठीमारात
बळी पडले लजपतराय
हे कठ़ोर अमानवी कृत्य
कळता भगतसिंग राजगुरूस
सुखदेवही झाले त्रस्त
झाले तीनही वीर भयग्रस्त
असेम्ब्लित बाॅम्ब टाकला
सॅन्डरस्ट उडवून दिला
केले वीरांना बंदीवान
लाहोर जेलमध्ये डांबून
तो काळा दिवस उगवला
23 मार्च 1931 सालाला
इन्कलाब जिंदाबाद
जयघोष शेवटचा केला
भयानक शिक्षा फाशीची
वेळ ठरली मग देण्याची
ते शूरवीर लडिवाळ
मातेचे परमवीर बाळ
मातेला शिरकमले अर्पून
चिरंजीव ठरला शहिद दिन
ही वीरगाथा शहिदांची
नित हृदयात स्मरण्याची
माझे विनम्र अभिवादन
चिरायू होवो हा शहिद दिन
मम भाव फूलांची श्रद्धांजली
अर्पिते तयांच्या चरणावरी
निर्मला ज्ञानेश्वर बोरकर
नागपूर















