सलग नऊ दिवस चालत असलेल्या अन्नत्याग उपोषण ला पूर्ण विराम

0
83

श्रीकांत राजपंगे
तालुका प्रतिनिधी, जिवती
प्रबोधिनी न्युज

जिवती- आज दि. 15-12-2023 जिवती तालुका भुमिहीन शेतकरी बचाव संघर्ष समितीचे पदाधिकारी सर्वश्री सुग्रीव गोतावळे, सुदाम राठोड, लक्ष्मन मंगाम, शब्बीर जहागीरदार, मुकेश चव्हाण, विजय गोतावळे, बालाजी भुत्ते, विनोद पवार, प्रेम चव्हाण व दयानंद राठोड यांच्या नेतृत्वात स्थानिक तहसील कार्यालयासमोर विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी मागील अनेक दिवसांपासून आमरण उपोषण सुरू होते.
याठिकाणी तीन दिवसांपूर्वी (दि. १२ डिसेंबर) मी भेट दिली आणि त्यांच्या मागण्या समजून घेतल्या तसेच राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात काल (दि.१४ डिसेंबर) नागपूर येथे यासंदर्भात बैठक घेऊन तोडगा काढण्यात आला.
त्या निमित्तानं, आज उपोषणस्थळी जाऊन उपोषणकर्त्यांना निंबूपाणी देत त्यांचे उपोषण सोडले.
यावेळी, उपविभागीय अधिकारी माने साहेब, तहसीलदार शेंबडवार, तालुकाध्यक्ष केशव गिरमाजी, भाजयुमोचे जिल्हा महामंत्री महेश देवकते, दत्ता राठोड, गोंगपचे पांडुरंग जाधव, ममताजी जाधव, केशव राठोड, भिमराव मडावी, अनुसया जाधव, बालाजी वाघमारे, विनोद पवार, दयानंद राठोड, राजेश राठोड, गोविंद टोकरे, प्रा. सावंत सर, प्रल्हाद मदणे, पुंडलिक गिरमाजी, डॉ. अंकुश गोतावळे, अशोक मोरे, मारोती बेल्लाळे यांचेसह अनेकांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here