दिपाली पाटील
जिल्हा उपसंपादक
चंद्रपूर
चंद्रपूर- संयुक्त राष्ट्र शिक्षण, सायन्स, संस्कृती संघटना (unesco) क्लब द्वारा जगातील 150 जास्त देशातील विद्यार्थी व युवकांना जगाला भेडसवणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी व ते करीत असलेल्या लक्ष गाठण्यासाठीच्या कार्याचे व उपायांची माहिती दूरदृश्य प्रणाली द्वारे पाठविण्याचे आव्हान करण्यात आले होते.हे लक्ष (goals) 1) गरिबी 2) भुकबळी 3) सुदृढ स्वास्थ 4)उच्चस्थर शिक्षा 5) लिंग समानता 6)वातावरण बदल सारख्या 17 समस्या व बिंदूवर आधारित होत्या.
वृक्षाई या आपल्या संस्थेद्वारे मागिल 18 वर्षांपासून इरई नदी मध्ये गाळ साचल्याने नदी मृतावस्तेत जात असून उन्हाळ्यात नागरिकांच्या विहीर व बोरिंग कोरड्या पडत असल्यामुळे मोठया प्रमाणात पाणी टंचाई व याउलट पावसाळ्यात महापुरा सारख्या संकटाला समोर जाव लागत असल्यामुळे खोलीकरण करने हाच उपाय सुचविला होता व 28 वर्षांपासून पर्यावरण रक्षणासाठी,जनतेमध्ये पर्यावरण व सामाजिक दातृत्वाची जनजागृती करण्यासाठी करीत असलेल्या कार्याची संशिप्त माहिती दिली होती.त्यात तिची निवड करुन तीला प्रशस्ती पत्र दुरप्रणाली द्वारे पाठविण्यात आले.भुमी ही यावर्षी 12 वि बि.जे.एम.कार्मेल अकादमी ची विद्यार्थिनी आहे.या विद्यार्थिनी -युवकांनी सुचविलेल्या उपायावर समस्त जगातील प्रतिनिधीशी विस्तृत चर्चा करुन संयुक्त राष्ट्र संघ हे उपाय संपूर्ण जगात कराव्यान्वित करतात.जगाला भेडसावणाऱ्या 17 समस्या वा बिंदूवर जगातील 150 हुन जास्त देशातील 5000 हुन जास्त विद्यार्थी-युवकांनी यात भाग घेतला होता.आपले वडील कुशाब व भाऊ ट्री बॉय अजिंक्य कायरकर हे वृक्षारोपण-पर्यावरण रक्षण करिता 28 वर्षांपासून कार्यरत असून व त्यांच्या कडे अनेक सृष्टी रक्षणाच्या कल्पना असूनही ते राष्ट्रीय-अंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मांडत नसल्याने ही जिम्मेदारी मि घेऊन unesco च्या मंचावर त्या कल्पना मांडल्याने समाधान मिळाल्याचे भुमी कायरकरने प्रबोधिनी न्युज ला सांगितले.

