परभणी जिल्हा अध्यक्ष रघुवीर सिंग टाक व पुणे जिल्हा अध्यक्ष अमोल खरात यांच्या मदतीतुन रक्कम वसुल
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या निःस्वार्थ कार्याने गोर, गरीब, गरजू, फसवणूक ग्रस्त लोकांना “नो निवेदन, नो निषेध, फैलसा ऑन दि स्पॉट” या पद्धतीने कार्य करण्यात परिचित असलेली व मा. संदीप भाई निकुंभ यांच्या संकल्पनेतून, मा.अश्विन भाई नाईक व मा. अरविंद भाई सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली निर्माण झालेली सर्व समावेशक सामाजिक संघटना दयावान सरकार महाराष्ट्र राज्य जिल्हा परभणी व जिल्हा पुणे च्या वतीने एका मध्यम वर्गीय कुटुंबातील विध्यार्थी याचे एका झटक्यात कॉल वर एका 28 हजार रुपये रक्कम एका खाजगी शाळेतून मिळवून देऊन कुटूंबियाची मदत केली आहे.
अधिक माहिती अशी कि, दिनांक 9 सप्टेंबर 2024 रोजी दयावान सरकार महाराष्ट्र राज्य परभणी जिल्हा अध्यक्ष मा. रघुवीर सिंग भाई टाक यांना एका अनोळखी नंबर वरून महिलेचा फोन आला. आणि म्हणाल्या “हॅलो, दादा दयावान सरकार का?” तेंव्हा रघुवीर सिंग भाई टाक यांनी उत्तर दिल “हो ताई मीच बोलतोय बोला, काय प्रॉब्लेम आहे? मी आपली काय मदत करू शकतो?” तेंव्हा त्या महिलेने मदत माघत सांगितले कि, “मी माझे पती व मुलगा असा परिवार पुणे येथे 2023-24 या शैक्षणिक वर्षात काही कामानिमित्त स्थायिक झालो होतोत. त्या दरम्यान आमच्या आर्थिक परिस्थिती नुसार पुणे येथील एका खाजगी शाळेत मुलाला 28 हजार रुपये फीस भरून ऍडमिशन केले होते. परंतु 1 महिन्यातच माझे पती यांची तबियत खराब होत होती. त्या कारणाने आम्ही पुणे सोडण्याचा निर्णय घेऊन ते परत परभणी ला आलो. माझा मुलगा साधारण त्या शाळेत एक महिना शिकला असेल त्या अनुषंगाने आम्ही शाळेत भरलेली विध्यार्थीची (मुलाची) फीस परत माघीतली. परंतु शाळा प्रशासनाने आम्हांला रक्कम देण्यास नकार दिला होता. मी व माझे पती वारंवार शाळेतील संबंधित शिक्षक, मुख्याध्यापक यांना विनंती करत होतो परंतु त्यांनी उडवा उडावी ची उत्तरे देत होते. असे करत करत 1 वर्ष लोटले तरीही आम्हांला रक्कम मिळाली नाही म्हणून मी ती रक्कम मिळवून देण्यासाठी आपल्याला मदतीसाठी संपर्क केला आहे कृपया आमची मदत करून रक्कम मिळवून द्यावी.” तेंव्हा सगळा प्रकार समजून घेऊन परभणी जिल्हा अध्यक्ष मा. रघुवीर सिंग भाई टाक यांनी सदरील महिलेले सांगितले कि, “ताई तुम्ही काळजी करू नका तुमचा एकही रुपया बुडू देणार नाही मी तुमच्या पाठीशी आहें हा दयावान सरकार च्या वतीने तुम्हाला माझा वादा आहे.” कॉल कट करून लगेच मा. रघुवीर सिंग भाई टाक यांनी दयावान सरकार चे दबंग डॅशिंग पुणे जिल्हा अध्यक्ष मा.अमोल भाई खरात यांना संपर्क करून सदरील सर्व प्रकार सांगितला तेंव्हा मा. अमोल भाई खरात यांनी सर्व प्रकरण समजून घेऊन दयावान सरकार च्या स्टाईल ने संबंधित शाळेस संपर्क साधून रक्कम परत करण्याचे सांगितले जर रक्कम परत नाही केली तर दयावन सरकार च्या स्टाईल ने रक्कम वसुल करण्यात येईल व त्याचे परिणाम ही भोगावे लागतील तेंव्हा संबंधित शाळेने त्या महिलेच्या अकॉउंट वर ऑनलाईन 28 हजार रुपये केवळ 2 मिनिटाच्या आत ट्रान्सफर केले आहे. रक्कम प्राप्त होताच सदरील मध्यम वर्गीय परिवाराने दयावान सरकार चे आभार मानले आहे.
अश्या पद्धतीने त्या महिलेस दयावान सरकार च्या वतीने परभणी जिल्हा अध्यक्ष रघुवीर सिंग भाई टाक व पुणे जिल्हा अध्यक्ष अमोल भाई खरात यांच्या मदतीतुन एका झटक्यात एका कॉल वर 28 हजार रुपये रक्कम वसुल करून मदत केली आहे. ही रक्कम वसुल करून दिल्या बद्दल सर्वच स्तरातून मा. रघुवीर सिंग भाई टाक व अमोल भाई खरात यांचे कौतुक करून अभिनंदन करण्यात येत आहे.

