शारदा भुयार जिल्हा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज, वाशिम – कारंजा (लाड) : संत गजानन महाराजांचे परमशिष्य असलेल्या पितांबर महाराजांच्या पावन पदस्पर्शाने पुण्यनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या “कोंडोली” ह्या वाशिम जिल्ह्यातील कारंजा मानोरा क्षेत्राच्या पावन भुमीतील लोकप्रिय व शिस्तप्रिय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमोल पाटणकर यांची मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांचे विशेष कार्य अधिकारी ‘ओएसडी’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीचे वृत्त वाशिम जिल्ह्यात धडकताच सर्वत्र आनंद व्यक्त केल्या जात आहे.सोबतच अमोल पाटणकर यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. विशेष म्हणजे अतिशय शांत,संयमी, विश्वासू,हजरजवाबी व कार्यतत्पर व्यक्तिमत्व म्हणून जिल्ह्याला त्यांची ओळख आहे. यापूर्वीही त्यांनी देवेन्द्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री असतांना त्यांचे अव्वल सचिव म्हणून उत्तमप्रकारे आपले कर्तव्य पार पाडले आहे.सोबतच उपमुख्यमंत्र्याचे अव्वल सचिव असतांना त्यांनी आपल्या मायभूमीचे पांग फेडण्यासाठी तळागाळातील आबालवृद्धांच्या विकासाकरीता जिल्ह्यातील विविध समस्या सोडवील्या आहेत त्यांच्या पुढाकारातून विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाच्या,मानधन वाढीच्या अध्यक्ष संजय कडोळे,लोमेश चौधरी, गजानन घुबडे, सुदाम तायडे, सागर कोटलवार,सुनिल गुंठेवार, प्रदिप वानखडे,उमेश अनासाने,विजय खंडार,अजाब ढळे,कांताबाई लोखंडे, छायाताई गावंडे, इंदिराबाई मात्रे यांच्या मागणीला मार्च 2024 यश मिळाले आहे. शिवाय श्रीगुरुमंदिर संस्थान कारंजा,श्री पितांबर महाराज संस्थान कोंडोली सोपिनाथ महाराज संस्थान तराळा इत्यादी अनेक संस्थानला तिर्थक्षेत्र विकासांतर्गत विकासनिधी मिळाला आहे. युवकांच्या क्रीडा स्पर्धकरीता त्यांनी केलेले कार्य बहुमोल आहे.इसन 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीत त्यांच्यावर तत्कालिन उपमुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांनी सोपविलेली जबाबदारी पार पाडत त्यांनी वाशिम-मंगरूळपीर आणि कारंजा-मानोरा ह्या दोन्ही विधानसभा मतदार संघातील दोन्ही उमेद्वारांना विजय प्राप्त करून दिलेला आहे.अशा यशस्वी,विकासाची दूरदृष्टी ठेवणाऱ्या,कार्यदक्ष आणि हजरजवाबी व्यक्तिमत्वाची निवड मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांचे ‘ओएसडी’ (मुख्य कार्य.अधिकारी) म्हणून झाल्यामुळे निश्चितच कारंजा मानोरा विधानसभा क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असल्याचे विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे (ज्येष्ठ पत्रकार) यांनी म्हटले असून, त्यांच्या निवडीने ग्राम कोंडोली वासीयांचा गौरव शासन दरबारी वाढला असल्याचे कोंडोली येथील ज्येष्ठ भाजपा कार्यकर्ते सुदाम तायडे, कविवर्य गजाननराव घुबडे, सागर कोटलवार आदींनी म्हटले आहे. कारंजेकर जनतेला मतदार संघाच्या विकासासाठी त्यांच्याकडून बऱ्याच अपेक्षा असून त्यांच्या प्रयत्नातून कारंजा शहराचा अ श्रेणी तिर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत शेगाव पंढरपूरच्या धर्तीवर कारंजाचा विकास होईल.सोहोळ काळविट अभयारण्य पर्यटकांकरीता खुले होऊन ग्रामस्थांना लघुव्यवसातून रोजगार उपलब्ध होईल.अशी आशा कारंजेकर जनता बाळगून आहे. आज रोजी सर्वत्र अमोल पाटणकरांचे अभिनंदन करण्यात येत असून कारंजा येथील सुनिल दहापूते, किरण क्षार,उमेश अनासाने, रमेश वानखडे,रोहीत महाजन, लोमेश चौधरी,दुष्यंत चौधरी, प्रदिप वानखडे, संजय कडोळे आदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

