जयेंद्र चव्हाण
विशेष जिल्हा प्रतिनिधी भंडारा
मो.9665175674
भंडारा – पुस्तकांसाठी घर बांधणारा जगातील एकमेव पुस्तकप्रेमी. तब्बल ५५ पुस्तके आणि अनेक ग्रंथाचा लेखक. सम्राट अशोक नंतर शांती आणि अहिंसामय अशी दुसरी धम्मक्रांती घडवून आणणारा महान बोधिसत्व. ऑक्सफर्ड विद्यापीठाने केलेल्या सर्वेक्षणात दहा हजार वर्षांमधीत १०० विश्वपुरुषांच्या यादीमधला हा चवथा विश्वरत्न. लंडन विद्यापीठामध्ये आठ वर्षे कालावधी लागणारा अभ्यासक्रम केवळ २ वर्षे ३ महिन्यामध्ये यशस्वीरीत्या पूर्ण करणारा कुशाग्र बुद्धीचा आदर्श विद्यार्थी होय. पाण्यासाठी सत्याग्रह करणारे जगातील एकमेव सत्याग्रही. कायदा, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मानववंशशास्त्र, समाजशास्त्र, घटनाशास्त्र, व्यापार, लेखन, समाजप्रवर्तन, साहित्य इत्यादी ज्ञानक्षेत्रातील विविध विषयांवर प्रभुत्व असणारा जगातील पहिला आणि भारतातील एकमेव सर्वाधिक हुशार व्यक्ती. जगातील सर्वात मोठे वैयक्तिक ग्रंथालय असणारा सर्वात थोर विद्याव्यासंगी. इ.स. २०१२ मध्ये झालेल्या सर्वेक्षणात सर्वोच्च दहा भारतीयांमध्ये अव्वल क्रमांक पटकाविणारा सर्वात महान भारतीय.
पाच हजार वर्षांचा इतिहास केवळ चाळीस वर्षात बदलणारा एक थोर युगपुरुष. लंडन विद्यापीठामध्ये आठ वर्षे कालावधी लागणारा अभ्यासक्रम केवळ २ वर्षे ३ महिन्यामध्ये यशस्वीरीत्या पूर्ण करणारा कुशाग्र बुद्धीचा विद्यार्थी. एका पेक्षा एक अशा तब्बल ३२ पदव्या मिळविणारा एकमेव भारतीय. पाण्यासाठी सत्याग्रह करणारे जगातील एकमेव सत्याग्रही. विसाव्या शतकातील जगातील सर्वात बुद्धीमान कायदेपंडित घटनातज्ञ. पाच हजार वर्षांचा इतिहास केवळ चाळीस वर्षात बदलणारा एक थोर युगपुरुष. म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर होय. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांनी केले. ते क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा प्रशासन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा प्रशासन, नेहरू युवा केंद्र, भारत स्काऊट अँड गाईड भंडारा यांच्या संयुक्त विद्यमानाने त्रिमूर्ती चौक येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना बोलत होते.
त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते, जिल्हा पोलीस अधीक्षक नुरूल हसन, जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ, जिल्हा क्रीडा अधिकारी लतिका लेकुरवाळे, नेहरू युवा केंद्राचे रमेश अहिरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष महादेव मेश्राम, सचिव मदन बागडे, कोषाध्यक्ष महेंद्र वाहने, क्रीडा अधिकारी अभय महल्ले, क्रीडा मार्गदर्शक पराग गावंडे, सामाजिक कार्यकर्ते तथा क्रीडा संघटक विलास केजरकर, सौरभ तोमर, गाईडच्या प्रमुख रूपाली सूर्यवंशी, रमेश जांगळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.त्यावेळी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला मार्ल्यापण करून मेणबत्ती व त्रिशरण पंचशील आणि भारतीय प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. त्यानंतर भारतीय संविधान सन्मान, सुरक्षा, संवर्धन राष्ट्रव्यापी अभियान अंतर्गत हस्ताक्षर (स्वाक्षरी) अभियान राबविण्यात आले.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानामुळे मी आज उच्च पदावर कार्यरत आहे. ते माझे दिशादर्शक आहेत. राज्यघटनेचे सर्वांना नैतिक अधिकार दिला आहे असे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधीक्षक नुरूल हसन यांनी केले. उपस्थित मान्यवरांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्र्यांंऱ्यावर मार्मिक उदाहरण देऊन मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जयश्री सातोकर (बनकर) व प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी लतिका लेकुरवाळे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार क्रीडा अधिकारी निखिलेश तभाणे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता राजेंद्र सावरबांधे, सुरज लेंडे, स्काऊट अँड गाईडच्या प्रमुख रूपाली सूर्यवंशी, अतुल गजभिये, सात्विक कांबळे, मृणाली वंजारी, विशाखा भोंगाडे तसेच जिल्हा क्रीडा संकुलनातील क्रीडा संघटक, क्रीडा अधिकारी कार्यालयातील अधिकारी, नेहरू युवा केंद्राचे कर्मचारी व कर्मचारी, खेळाडू स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी सहकार्य केले.

