जयेंद्र चव्हाण
विशेष जिल्हा प्रतिनिधी भंडारा
मो.9665175674
भंडारा – भंडारा गोंदिया जिल्हा इकाई आणि राष्ट्र चेतना प्रेरणा व्दारा राष्ट्र निर्माता डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांची 134 वी जयंती उत्सव मोठ्या हर्ष उल्हासात साजरा करण्यात आला. 14 एप्रिल ला सकाळी 8.45 ला टाकळी येथून संपूर्ण भंडारा शहरात अंदाजे 200 कार आणि मोटार सायकल ने रॅली काढून भंडारा वासियांसाठी मुख्य आकर्षण बनले होते.
राष्ट्र चेतना प्रेरणा मंच व्दारा आयोजित मोटारबाईक तथा कार रैली मध्ये राष्ट्रध्वज आणि राष्ट्र निर्माता डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा संपूर्ण सजावटीसह, राष्ट्र निर्माणसाठीचा संदेश प्रदर्शित करनेवाली झांकी रैली चे आयोजन करण्यात आले.या रैली ची सुरूवात (टाकळी ) दसरा मैदान येथून करण्यात आली आणि समारोप मुस्लिम लायब्रेरी चौक येथे करण्यात आले.या रैली मध्ये मोठ्या संख्येने बाइक्स, मोटारसायकल आणि कार ने राष्ट्रीय संस्कृतिचे प्रदर्शन करत असल्याने राष्ट्र चेतना चा संदेश प्रसारित करत असल्याचे दिसत होते . राष्ट्र चेतना मंच रॅली मेन रोड ने सकाळी 11.45 वाजता भंडारा शहरातील नामांकित सामाजिक संघटक डॉ.मधुकर रंगारी, डॉ.महेन्द्र गणवीर, डॉ.विनायक रोडगे, डॉ.संजय वाणे, डॉ.मालनसूत अरूण आदि च्या नेतृत्वात , चार मुर्ती जवळ कलेक्टर चौक स्थित डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले .
यावेळी उपस्थितांनी आणि चार मूर्ती चौकातील सर्व राष्ट्रप्रेमी गणमान्यवरांनी सावधान राष्ट्रगीत म्हणुन राष्ट्र चेतना निर्माण केले. आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैचारिक स्मृतींना आदरांजली अर्पण केले.
या राष्ट्र चेतना मंच रैली चा समारोपीय कार्यक्रम मुस्लिम लायब्रेरी कल्चरल हॉल येथे करण्यात आला. कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा.स्मिता राऊत यांनी केले.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थान ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्रेमा सुखदेवे यांनी भूषविले तर प्रमुख अतिथी म्हणून मुबारक अली सैय्यद , पास्टर एम.एस.सैजान जे.एस.भाटिया यांनी अतिथी म्हणुन स्थान भूषविले. यावेळी या अतिथिंनी मार्गदर्शन करून राष्ट्र चेतना जागृती साठी उत्साहित करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी हम भारत के लोग साथ मिलकर भारत राष्ट्र का निर्माण कर करु शकतो त्यासाठी सांघिक राष्ट्र निर्मान लक्ष असला पाहिजे आणि त्यासाठी पुर्ण शक्ति निशी प्रतिकार करण्याची आवश्यकता असल्याचे विचार मांडले.
यावेळी ,डॉ . विनोद अनाव्रत द्वारा लिखित, शूद्र नेतृत्व नहीं कर सकते! या पुस्तकाचे विमोचन, संपूर्ण अतिथीगण आणि राष्ट्र चेतना प्रेरणा मंच व इकाई च्या उपस्थीत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन पौर्णिमा सहारे यांनी केले.सर्व उपस्थीत राष्ट्रप्रेमीयांनी नवीन संकल्प रूपी प्रतिज्ञा घेतली. कार्यक्रमाचे आभार शेंडे यांनी मानले.

