चंद्रपूर – दि. 4 जून : इयत्ता 10 वी व 12 वी मध्ये शाळा / तालुका / जिल्हा / विभागातून प्रथम येणाऱ्या अनुसुचित जातीच्या विद्यार्थ्यांस राजश्री छत्रपती शाहु महाराज गुणवत्ता पुरस्कार योजनेद्वारे अनुक्रमे 5 हजार, 10 हजार, 25 हजार, 50 हजार रुपये गुणवत्ता पुरस्कार देण्यात येतो. योजनेचा लाभ घेण्याकरीता संबंधित शाळा / कनिष्ठ महाविद्यालय यांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, चंद्रपुर या कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. प्रस्तावासोबत विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र, गुणपत्रिका, बैंक पासबुकची झेरॉक्स, आधार कार्ड व टी.सी. सादर करावे.
प्रस्ताव सादर न केल्यामुळे पात्र विद्यार्थी जर पुरस्कारापासुन वंचित राहिल्यास त्याची संपूण जबाबदारी ही सबंधित संस्थेच्या मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांची राहील, याची गांभिर्याने नोंद घ्यावी व तात्काळ प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विनोद मोहतुरे यांनी केले आहे.

