देसाईगंज प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – दि २२ जून – केंद्र सरकारने नुकताच जातनिहाय जनगणना करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला असून, या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी ओबीसी समाज संघटना तालुका देसाईगंज यांच्या वतीने अभिनंदन सोहळा व ओबीसी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
हा कार्यक्रम हटवार मंगल कार्यालय, देसाईगंज येथे उत्साही वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे आमदार मा रामदास मसराम यांचा सत्कार व त्यांचे मार्मिक मार्गदर्शन
आमदार रामदास मसराम सर यांनी आपल्यजातनिहाय जनगणना ही सामाजिक न्यायाच्या दिशेने महत्त्वाची पायरी आहे, असे मत व्यक्त केले. त्यांनी ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी संघर्ष करण्याचे आवाहन करत, संघटित राहून सामाजिक व राजकीय समतेसाठी एकत्र यावे, असे सांगितले.
कार्यक्रमाला उपस्थित, गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ मा. नामदेवजी किरसान साहेब, माजी आमदार कृष्णा गजबे, ओबीसी संघटनाचे अध्यक्ष लोकमान्यजी बरडे तसेच परिसरातील मान्यवर, समाजबांधव, युवक, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.व संघटनेचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

