prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – प्रजासत्ताक दिन

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – प्रजासत्ताक दिन

0
87

अंधारयुगाचा अस्त होऊन
नवयुगाची सुरुवात झाली;
भारताची नवी राज्यघटना,
नवविचार घेत अंमलात आली.

महान प्रजासत्ताक दिनी
उजळलं देशाचं भविष्य;
तळागाळातील माणसांचं,
सुरक्षित केलं सारं आयुष्य.

धर्मांधतेला बाजूला सारून
धर्मनिरपेक्षता रुजू झाली;
प्रत्येक धर्माला समान ठेऊन,
मानवता नांदायला लागली.

स्वातंत्र्य- समता- बंधुतेचं
देशभर उभं राहिलं पीक;
लोकशाही विचारासाठी,
भारत देश ठरला सुपीक.

प्रत्येक मताला समान मुल्य
स्थापित केली समानता;
श्रीमंत असो वा असो गरीब,
लोटली दूर सारी विषमता.

साऱ्या जगात सर्वश्रेष्ठ
भारत देशाचे संविधान;
आदर करावा प्रत्येकाने,
राखावा देशाचा अभिमान .

रवि ताकसांडे
गडचांदुर जि.चंद्रपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here