शेतकरी जनतेची मुख्यमंत्री यांना निवेदनातून मागणी
सिंदेवाही प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि कृषी क्षेत्राचा विकास करून शेतकरी जनतेचे हित जोपासणे हे शासनाचे काम आहे. शेतकरी अन्नदाता हा सुखी झाला पाहीजे म्हणून शासन स्तरावर विविध योजना येतात. मग ही फक्त आठ तास दिवसाला शेतकरी यांना विद्युत पुरवठा करण्याची शेतकरी जनतेसाठी मारक योजना आहे. हजारो शेतकरी या योजनेमुळे जीवन विस्कळीत होते त्यामुळे शेतकरी जनतेला पुन्हा डबघाईस जाणे आहे.
चंद्रपूर जिल्हयातील सिंदेवाही तालुका हा संपूर्ण भात (धान) उत्पादक तालुका म्हणून प्रसिद्ध आहे तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग वास्तव्यास आहे .या तालुक्यात कोणताही मोठा उद्योग नसल्याने आपली परपंरागत शेती व्यवसाय करुण शेतकरी यांना आपले परीवार चालवावा लागतो आहे आणी तालुक्यात कोणताही मोठा सिंचन प्रकल्प नाही. परीसरातील जनतेला हरीत क्रांतीचे स्वप्न दाखवणारा हुमन सिंचन प्रकल्प चाळीस वर्षापासून रखडून पडला आहे. दरवर्षाला शेती व्यवसाय हा उत्पन्नापेक्षा खर्च अधीक असल्याने तोटयात जात आहे. सध्यास्थितीत तालुक्यातील बर्याच गावात शेतात बोरवेल मारून डबल फसल म्हणजे पावसाळी व उन्हाळी अश्या दोन फसल धान उत्पन्न घेण्याचे काम शेतकरी करीत आहेत. त्यासाठी शेतकरी यांना मोटार पंप चालवण्यासाठी पूर्णपणे दिवसभर म्हणजे चोविस तास विज पुरवठा आवश्यक आहे. त्यामुळे शेतकरी यांना दोन फसल उत्पन्न घेवून थोडी फार प्रमाणात आपले डबघाईस आलेली परीस्थीती सुधारण्याची जेमतेम स्थीती उदयास आलेली दिसत असतांना व शेतकरी यांचेमुळे मजुरांचे हाताला बारमाही काम मीळत असतांना त्यावर शासनाचे निर्णयाने नैराश्य पसविरले आहे. कारण धानपीक हे मुबलक पाणी असल्याशीवाय पूर्ण होत नाही. आणी दिवसे -दिवस पाहीजे त्या प्रमाणात पावसाळ्यात पाणी पडत नाही त्यामळे कोरडा दुष्काळ पडतो आणी यावेळी शेतातील बोरवेल पंप हे शेतीतील उत्पन्न पूर्ण करण्याचे काम करतो. पंरतु त्यासाठी विज आवश्यक आहे आणी ती चोविस तास विज पुरवठा पाहीजे आहे. आणी शेतात उन्हाळी धान उत्पन्न घेण्यासाठी सुद्धा त्याच प्रमाणात विजेचा चोविस तास पुरवठा होणे गरजेचे आहे.त्याशीवाय शेतकरी यांची शेती जगु शकणार नाही. आणी शेतातील उत्पन्न होणार नाही.
पंरतु नविन शासकीय धोरणानुसार शेतकरी कृषी पंपधारक यांना फक्त आठ तास शेतीसाठी विज पुरवठा करण्यात येईल असा फतवा काढुन कृषी पंपाकरीता वेगळी विद्यूत वाहीनी तयार करण्याचे काम सुरु आहे आणी यात फक्त शेतकरी यांना शेती पंपासाठी फक्त आठ तास विज देता येण्याची योजना आखली जात आहे .ही योजना शेतकरी यांना मारक असुन ती बंद करावी आणी आतापर्यंत ज्या पद्धतीने चोविस तास विज पुरवठा चालु होता तसाच कायम स्वरुपी सुरु ठेवावा या मागणीसाठी रत्नापूर येथील शेकडो शेतकरी यांचे सह्या असलेले निवेदन मुख्यमंत्री, उर्जामंत्री ,पालकमंत्री, विरोधी पक्षनेता तथा स्थानिक आमदार ब्रम्हपुरी क्षेत्र जिल्हाधिकारी यांना तहसिलदार , विद्युत विभाग शाखा अभियंता गडचिरोली, सिंदेवाही ,नवरगाव यांना दिले असुन शेतकरी यांचे हीत जोपासण्या साठी कृषी पंपाची चोविस तास विद्युत पुरवठा सुरु ठेवण्याची मागणी तालुक्यातील शेतकरी यांनी निवेदनातुन केलेली आहे.नागपूर येथील अधिवेशनात मुख्यमंत्री यांना निवेदन दिले यावेळी संदीप डोंगरावर ,नेताजी गहाणे, बालाजी लेंझे, युवराज पर्वते, प्रविण लोखंडे व इतर शेतकरी उपस्थीत होते.

