बळीराम लांडगे
तालुका प्रतिनिधी
उदगीर
उदगीर (दि.०३) गेली पाच वर्षापासून श्री.भरत भाऊ चामले यांच्या वाढदिवसानिमित्त मूकबधिर व मतिमंद विद्यार्थ्यांना मिष्ठानाची भोजन देण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजक युवराजभैय्या कांडगिरे युवामंच उदगीर यांच्या वतीने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.या ठिकाणी भरत भाऊ चामले यांनी शाळेमध्ये येऊन विद्यार्थ्यांच्या समवेत वाढदिवस साजरा केला व विद्यार्थ्यांच्या समवेत पंगतीला बसुन भोजन केले.हे सर्व पाहत असताना त्यांनी यावेळेस असे संबोधले की,आम्हाला तर दोन डोळे दोन पाय दोन हात या ठिकाणी देवाने दिलेली आहेत पण या मुलांच्या मनातील भाव आम्हाला इथे आल्यानंतरच कळाले मतिमंद व मूकबधिर मुले काय असतात त्यांच्या शाळा असतात तेवढेच माहीत होतं पण स्वतःची खात्री झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील निरागसपणा, त्यांचा आनंद,ना कुठली चिंता ना कुणाशी देणे घेणे फक्त आणि फक्त आपल्या आपल्या दुनियेमध्ये मग्न असणारे विद्यार्थी या ठिकाणी मी पाहिले माझे मन खूप भरून गेले.
भरत भाऊ चामले साहेबांनी तर या शाळेत आल्यानंतर मला अंगावर रोमांच उभे राहते या ठिकाणी अंगाला शहारा येतो या मुलांना बघून माझं मन खूप मन गहिवरून येतं.फक्त मला या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगगणित करायचं होता तो छोटासा प्रयत्न या ठिकाणी मी केला.
मी एक नाममात्र आहे पण करता आणि करविता या शाळेतील सर्व कर्मचारी व संस्थाप्रमुखच आहेत.. प्रत्येक सामाजिक कार्यकर्ते असतील वा सर्वसामान्य जनतेतील सुजान नागरिकांनी खरंच या मुलांमध्ये येऊन आपला आनंद या ठिकाणी आपण व्यक्त करावा अशी प्रांजळपणे भावना त्यांनी या ठिकाणी व्यक्त केली.मला प्रत्येक वाढदिवसाच्या निमित्ताने या मतिमंद मधील मुलांसाठी काही ना काही या ठिकाणी करायचा असा अभिवचन या ठिकाणी भरत भाऊ साहेबांनी दिले.
कार्यक्रमाचे उपस्थित मध्ये ज्येष्ठ पत्रकार सुरेश नेत्रगावकर, संगम पटवारी पत्रकार,बाळासाहेब नवाडे,युवा नेते युवराज कांडगिरे,भूषण कानवटे,ऋषीकेश पाटील,विनीत पडिले, ऋषीकेश रेड्डी, विपुल सोनकांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विकासजी तपशाळे यांनी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

