ग्रामीण कवी श्रीराम घडे यांची भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंचाच्या महाराष्ट्र राज्य समन्वयक पदी निवड

0
92

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क – ग्रामीण हास्य कवी म्हणून प्रसिद्ध असणारे ग्रामीण कवी श्रीराम विध्यासागर घडे यांची भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच च्या “महाराष्ट्र राज्य समन्वयक” पदी नुकतीच निवडकरण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे की, काव्यक्षेत्राची तसेच शेती मातीची जाण असणारे ,शेतकरी पुत्र ग्रामीण भागातून शहरात नोकरीच्या निमित्ताने शहरात येऊन आपला सांस्कृतिक वसा आणि शेतकऱ्याची व्यथा मांडणारे ,एकदम सोप्या शब्दात सर्वांना आपलेसे करणारे आणि आपल्या काव्यातून श्रोत्यांना खळखळून हसवणारे ग्रामीण हास्य कवी अशी महाराष्ट्र भर ओळख निर्माण करणारे ग्रामीण कवी, गीतकार, निर्माता अशा अनेक भूमिका निभावणारे तसेच स्वतः च्या आणि कवी आणि कवयित्री यांच्या कवितेला संगीत बद्ध करून सर्वांचे मनोरंजन करणारे कवी श्रीराम घडे यांची साहित्य कला, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील आवड पाहून, साहित्य क्षेत्रातीलविविध समस्या सोडवण्यासाठी , समूहासाठी वेळोवेळी दिलेले योगदान या बाबींचा विचार करून त्यांची भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच च्या “महाराष्ट्र राज्य समन्वयक” पदी निवड झाल्याबद्दल श्रीराम घडे यांचे मनपूर्वक अभिनंदन
भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच च्या “महाराष्ट्र राज्य समन्वयक” पदी दिनांक ०४ डिसेंबर २०२४ रोजी नुकतीच निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल संघटनेचे अध्यक्ष मा. विशाल सिरसट, उपाध्यक्ष विजय जायभाये, कार्याध्यक्षा शिल्पा मुसळे, राष्ट्रीय सचिव बारकू आघाव, सहसचिव योगेश हरणे आदीसह अनेकांनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here