
पुणे जिल्हा विशेष प्रतिनिधी दत्ता हणवते – महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा कायदा हा सार्वजनिक संस्था, संस्था, स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून होणारे सामाजिक कार्य संपविण्याचे मोठे षडयंत्र आहे. या मुळे लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे हा कायदा जर अस्तित्वात आला तर कोणत्याही व्यक्तीला व संघटना यांना कोणत्याही विषयावर शासनाविरूध्द बोलता येणार नाही हा महाराष्ट्र सरकारचा संविधानविरोधी कृत्य आहे त्यामुळे भिम आर्मी भारत एकता मिशन या कायद्याला विरोध करत आहे भिम आर्मी व आंबेडकरवादी संघटना पक्ष समविचारी लोकांच्या माध्यमातून या महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा कायद्याला विरोध असुन सरकारने हा कायदा रोखला नाही तर राज्यात आणि देशात जन आंदोलन उभारू असा इशारा भिम आर्मी चे महाराष्ट्र प्रदेश संघटक तथा मराठवाडा निरीक्षक अक्षय धावारे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिला आहे.












