
आठवण येते, आम्हा
ज्ञानी आंबेडकरांची
संविधान लिहिलेल्या
गुणी, हो शिल्पकाराची!
ज्यांनी दिला, समाजात
दीन- दलितांना आधार …
नाही घेतली, कधीच
शून्यातून रे माघार !
आंबेडकर म्हणजे,
लोकशाहीची ती शान
ज्यांनी उंचावली, आहे
संविधानातून मान !
धर्मनिरपेक्षतेचे
भान, नेहमी ठेवून
दिली करून हक्काची,
कर्तव्य, न्यायाची जाणं!
जीवनात त्या स्वतःच्या
हाल, अपेष्टा करुन ….
दीन-दुबळ्यां , लोकांची
दिली, उणीव भरून !
दिली ती, समानतेची
नवी क्रांती घडवून
नाही, कुणाला ठेवले
हक्कासाठी अडवून!
दिला ज्ञानाचा प्रकाश
प्रगतीची एक, आसं
आणला तो घडवून
एक, क्रांती इतिहास !
क्रांती पाहता अपार..…
तुम्ही, महामानवाची
जगा भासली उणीव ,
सदा लोकांना तयाची !
कायद्याचे ,हक्क,न्याय,
संविधान ग लिहून
जगामध्ये आहे ,त्याचा
कायदा आणि कानून!
सर्वांनाच मिळवून
दिले हक्क ते समान ….
आहे हे आमचे खरे
भारतीय संविधान!
कवयित्री अलका बाळू भवारी
पुणे












