कठानी नदी ते बीएससी कॉलेज नवेगाव ते माडेतुकुम पर्यंत उड्डाण पुलाची मागणी
निवासी जिल्हाधिकारी मार्फत केंद्रीय मंत्री नामदार नितिन गडकरी यांना निवेदन
Gadchiroli Repoter Prabodhini News – गडचिरोली जिल्ह्यात सुरजागढ येथे लोहखनिज उत्खनन सुरू असल्यामुळे लोहखनिज वाहतूक करणारे जड वाहने हे गडचिरोली शहरातून बाहेर राज्यात जातात जड वाहनांमुळे अनेक अपघात होऊन निष्पाप लोकांचा बळी गेला आहे.
गडचिरोली जिल्ह्यातून सुरजागढ लोहखनिज प्रकल्पातून लॉयड अँड मेटल्स कंपनी कडून हजारो कोटी रुपयांचा महसूल सरकारला मिळतो शहरात वाहतुकीचा प्रमाण अधिक वाढला आहे जिवीत हानी रोखण्याकरीता
गडचिरोली शहरात इतर जिल्ह्याप्रमाने उड्डाण पुलाची अत्यंत आवश्यकता आहे
गडचिरोली शहरातील कठानी नदी ते बी.एस.सी.कॉलेज आणि नवेगाव ते माडेतुकुम इथ पर्यंत उड्डाण पूल देण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा एमआयएम पक्षाचे जिल्हा अध्यक्ष बाशिद शेख, युवा आघाडी जिल्हा अध्यक्ष दिलीप बांबोळे, सोशल मीडिया प्रमुख जावेद शेख, महिला जिल्हा अध्यक्ष आयशा अली सय्यद, किरणं सहारे, महासचिव मुकेश डोंगरे, युवा आघाडी शहर अध्यक्ष मुन्ना रामटेके, राकेश वेसकडे, महबुब मलिक, शहेबाज शेख, सलाम शेख, रेहान शेख, जिशान शेख, आदि उपस्थित होते.

