शैलिका सागवरे
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
चंद्रपूर – निवडणूका येतात जातात, निवडणूक आयोग असो वा जिल्हा प्रशासन तसेच राजकीय पक्ष सुद्धा मतदारांनी मतदान करावे मतदान टक्का वाढावा यासाठी आवाहन, प्रबोधन करतात तरीही अनेक मतदाते मतदानाला प्रतिसाद देत नाहीत त्यामुळे मतदान टक्केवारी शत प्रतिशत तर जाऊ द्या समाधानकारक होत नाही त्यामुळे अनेक चुकीचे जनप्रतिनिधी सरकारमध्ये सहभागी होतात व देश नियोजन बिघडते त्यामुळे अनेक चांगल्या योजना जनसामान्य पर्यंत पोचत नाहीत त्यामुळे देशाच्या विकासाला खिळ बसते त्यामुळे प्रत्येक मतदा रानी तो नवा असो वा जुना मतदार असो कर्तव्य भावनेने निवडणुकात मतदान करावे असे कळकळीचे आवाहन विक लांग सेवा संस्था पदाधिकारी तथा विज केंद्राचे कर्मचारी नितीन राव ह्यांनी तुकूम परिसरात जनजागृती स्वरूपात केले.
यासाठी शिवानी बोबडे, देवराव कोंडेकर, राजश्री शिंदे, सीमा दुपारे, प्रसाद पा. न्हेरकर, खुशाल ठलाल ह्यांनी सहकार्य केले.

