बल्लारशाह-गोंदिया रेल्वे रुळावर रेल्वेच्या धडकेने एका नर अस्वलचा दुर्दैवी मृत्यू

0
289

सुविद्या बांबोडे जिल्हा संपादक प्रबोधिनी न्युज चंद्रपूर – बल्लारशाह-गोंदिया रेल्वे रुळावर एका नर अस्वलाच लोहारा जंगलात ७:३० च्या सुमारास गोंदिया कडून येणाऱ्या रेल्वेच्या धडकेत अपघाती दुर्दैवी मृत्यू झाला, रेल्वे विभागाकडून वनविभागाला घटनेची माहिती देण्यात आली ,रेल्वे चे कर्मचारी व वनविभागाचे कर्मचारी घटनेच्या ठिकाणी पोहोचले,आणि विरुद्ध दिशेनी येणारी मालगाडी जी गोंदिया च्या दिशेनी जात होती, ती मालगाडी जवळपास २ तास अस्वल मृत पावलेल्या ठिकाणी थांबून होती, वनविभाग व रेल्वे चे कर्मचाऱ्यांनी मिळून अस्वलीला रेल्वे रुळावरून बाजूला केले ,तेव्हा ती मालगाडी पुढे निघाली.
बल्लारशा-गोंदिया रेल्वे रुळावर मागील तीन दिवसात ४ अस्वलाचा रेल्वेच्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे, “डेथ ट्रॅप” म्हणून ओळख झालेल्या ह्या रेल्वे राउळावर अनेक वन्यजीवांना जीव गमवावा लागत आहे ,पण उपाय योजना शून्य, असे किती दिवस आपण फक्त आकडे मोजायचे,चंद्रपूर जिल्ह्याचे वनवैभव असे नष्ट होत राहिले तर आपल्या हाती काय उरणार आहे,रेल्वे प्रशासनाकडून आणि वनविभाग कडून लवकरात लवकर उपाय योजना कराव्या लागतील तरच हे वन्यजीव जंगलात सुरक्षित राहतील.
हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटी तर्फे जुनोना वनपरिक्षेत्र अधिकारी यांना बल्लारशाह-गोंदिया रेल्वे रुळावर उपशमन योजना मार्गी लागण्यासाठी पत्र देण्यात आले आहे. हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटी तर्फे बल्लारशाह-गोंदिया रेल्वे रुळावर नेहमी वन्यजीव संदर्भात लक्ष ठेवण्यात येते.
वन्यजीवांचे अपघात टाळण्यासाठी चंद्रपूर वनविभागातर्फे एक समिती नेमण्यात आली, रेल्वे प्रशासनाला सूचना सुचविण्यात आल्या पण अजूनही कुठलीही उपाय योजना वन्यजीवांसाठी केली नसल्याने अपघात संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे, रेल्वे प्रशासनाला जंगल परिसरातून रेल्वेची गती संध्याकाळी ७ ते सकाळी ७ पर्यंत ५०-६० प्रति किलोमीटर ठेवण्याचे सुचविण्यात आले
बल्लारशाह- गोंदिया रेल्वे मार्ग, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या लगतच आहे, आणि वाघांचा भ्रमण मार्ग सुद्धा आहे, नव्याने घोषित झालेल्या कन्हाळगाव अभयारण्य आहे, कावल अभयारण्य, उमरेड- कऱ्हांडला अभयारण्य च्या भ्रमण मार्गात हा रेल्वे मार्ग येतो, हाच रेल्वे मार्ग पुढे, बालाघाट- नैनपूर मध्य प्रदेश, मधून जातो, पण तिथल्या रेल्वे प्रशासनाने वन्यजीवांसाठी उपाय योजना म्हणून अंडर पासेस, ओव्हर पासेस बांधण्यात आलेले आहे, मग महाराष्ट्रात रेल्वे प्रशासन कडून वन्यजीवांसाठी उपाय योजना का करण्यात आलेल्या नाही, आणखी किती वन्यजीवांचे बळी गेल्यावर रेल्वे प्रशासनाला जग येणार आहे.
अस्वलीचे शव-विच्छेदन डॉ.कुंदन पोदसेलवार यांनी केले.शव-विच्छेदन करतांना घटना स्थळी जुनोना वनविकास महामंडळाचे सहाय्यक व्यवस्थापक कदम साहेब, वनपरिक्षेत्र अधिकारी मेश्राम, वनरक्षक कांबळे, हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटी चे दिनेश खाटे, अंकित बाकडे, वनविकास महामंडळाचे वनमजूर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here