शेतकऱ्यांच्या वतीने घुग्घुस पोलीस स्टेशनचे मा. श्याम सोनटक्के पोलिस निरीक्षक घुग्घुस यांना भेटून तक्रार
घुग्घुस प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – चंद्रपूर तालुक्यातील घुग्घुस, बेलसणी, शिदूर, मुरसा व इतर गावातील मध्यरात्र वेळी चोर 5 ते 6 जणांची टोळी करून शेतकऱ्यांच्या गोठ्यात बांधून असलेले शेळी ( बकरे) चोरी करून घेऊन जातात शेतकऱ्यांसाठी शेती व्यतरिक्त जोड व्यवसाय म्हंजे शेळी, बकरे पालन आहेत चोरीमुळे शेतकऱ्यांची खूप आर्थिक हानी होते.
एका शेळीचे, बकऱ्याची किंमत साधारणत 12,000 किव्हा त्या पेक्षा कमी जास्त असू शकते. शेतकऱ्यांना असे नुकसान होणे परवडणारे नसून त्यावर लवकरात लवकर चोरी करणाऱ्या चोरट्यांना पकडून ताब्यात घ्यावं अशी स्वराज्य शेतकरी संघटनेच्या माध्यमातून विनंती करण्यात आली.

