जालना जिल्ह्यातील भोकरदान मौजे आणवा गावात घडलेली घटना
जालना प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – सध्या देशातील नागरिकांना त्यांच्या मनात घर करून बसलेली जात ही जात का ?? नाही असा प्रश्न जनतेला पडलेला आहे. जातीवाद आणि पूर्व वैमस्यातून होत असलेल्या अमानुष मारहाण करून जिवे ठार मारणे तसेच त्यांचे चित्रीकरण करून सोशल मीडियावर प्रसारित करणे या मागचा याचा उद्देश काय. असावा
महाशिवरात्री च्या दिवशी महादेव मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या कैलास बोऱ्हाडे याच्या पार्श्व भागात सळई गरम करून आत घालने हा माणुसकीला काळीमा फासणारी निंदनीय घटना आहे. बीड मधील संतोष देशमुख यांच्या सोबत ही अशाच प्रकारच्या अमानुष मारहाण प्रकरणात आरोपी अजून ही मोकाट आहेत. मौजे अन्नवा तालुका भोकरदन तालुक्यातील जनतेत भीतीचे वातावरण पसरले असून अठरा पगड जातींच्या लोकांना ही काळजी वाटत असेल . सध्या पूर्ववैनस्यातून जिवे ठार मारणे आणि त्याचा सोबत अमानुष प्रकारे मारहाण करत असतानाचे व्हिडिओ प्रसारित करणे .हे काळीमा फासणारी घटना आहे.
.अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी शासनाने पुढाकार घेऊन आरोपीला कडल शिक्षा करावी आशी सामजिक कार्यकर्ते हिरामण ठोंबरे प्रतिनिधी शी बोलताना कड्क शब्दात तीव्र निषेध नोंदवत होते.
हे असच जर चालू राहिले तर सर्व सामान्य जनतेने न्याय मागायचा कोणाकडे . असे ही सामाजिक कार्यकर्ते हिरामण ठोंबरे महणाले

