
डॉ. सुखदेव काटकर तुमसर तालुका प्रतिनिधी – तुमसर तालुक्यातील आलेसुर गावाच्या होणारा नवरदेव राहूल काशीराम राऊत 27 ह्याचे लग्न 30/4/25 ला संध्याकाळी ठरले होते.पण तो 28/4/25 पासून बेपत्ता होता. अखेर लग्नाच्या तारखेला तो आला नाही म्हणून गोबरवाई पोलीस स्टेशन ला तक्रार देण्यात आली. अखेर फार वाईट झाला 1/5/2025 ला राहुल गावच्या शिवारामध्ये विहिरीमध्ये मृत अवस्थेत आढळला. गोबरवाई पोलीस स्टेशनला याची सूचना दिली. मृत देह बाहेर काढले. पोलिसांच्या प्राथमिक अंदाज आहे. की शरीरावर कोणती खुणा नाही म्हणजेच याचा अर्थ यांनी आत्महत्या केली .हे प्राथमिक अंदाज आहे. बॉडीला पोस्टमार्टम करता तुमसरला पाठविण्यात आले. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. गावामध्ये फार शोक कळा पसरली आहे. गोबरवाही पोलीस ठाण्याचे अधिकारी पुढची तपासणी करीत आहे. थाना प्रभारी शरद शेवाळे च्या मार्गदर्शनात सुरू आहे.















