
जळगाव प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
डॉ. ऐश्वर्री राठोड यांच्या माध्यमातून जामनेर येथे व संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये महिलांचे संघटन या संघटनांमध्ये विविध विषय मग ते महिलांचं सशक्तिकरण असो किंवा महिलांच्या राजकारणातील भूमिका असुद्यात, किंवा मुलींना शिक्षणाचा दर्जा व याच माध्यमातून मुलींना व महिलांना होणारा समाजामधील त्रास अशा विविध माध्यमातून बघितल्या गेलं तर आज हीच भूमिका आहे की महिलांना विविध माध्यमातून या महिला एकमेकांशी संघटित होऊन निवारण करू शकतात .तर हाच उपक्रम डॉ. ऐश्वर्री राठोड यांनी आपल्या हातामध्ये घेतलेला असून अशा अनेक महिला महाराष्ट्रातून आणि इतर जिल्ह्यातून तसेच जामनेर मधून जोडण्याचा प्रयत्न व त्यांच्यासोबत कार्यक्रमाचे उपक्रम जसे की आरोग्य शिबीर, असू द्यात हळदीकुंकू चे कार्यक्रम असू द्यात ,किंवा शैक्षणिक अभियान असू द्या अशा प्रकारच्या कार्यक्रमाचा उपक्रम हा डॉ. ऐश्वर्री राठोड यांनी नेहमीच राबवलेला आहे आणि यापुढेही राबवणार आहे हे धोरण आणि हे ध्येय आणि हे काम करण्याची शक्ती ही नेहमीच काँग्रेस विचारधारेतून एक उत्कृष्ट विचारधारा म्हणून स्वतःच्या मनाला संबोधित असते.














