लेख – ‘मुलाला मुलगी मिळेना.. मुलीला मुलगा भेटेना..”

0
122

आजकाल ही खरीच मोठी समस्या होऊन बसली आहे. मुलांबरोबरीने मुली सुद्धा खुप शिकत आहेत. खांद्याला खांदा लाऊन नोकरीतही जबाबदारीने यश मिळवत आहेत.
सर्वांचीच रहाणी, देहबोली,वर्तन हे आकर्षक असल्याने मुले काय किंवा मुली काय कोणीच स्वत:ला रूपात कमी समजत नाहीत.
घरी सुद्धा आया नोकरी करणार्या असल्याने व हल्ली एक किंवा दोनच मुलं असल्याने या मुलांचे फाजिल लाड, चंगळवाद, आवडेल तोच पोषाख,इ. हट्ट पुरवले जातात.
त्यांना तडजोड, संयम, मोठ्यांचा किंवा दुसर्याच्या मतांचा आदर करणे, अपयश व नकार पचवणे हे संस्कारच शिकवले जात नाहीत.
त्यामुळे मी करीन तेच बरोबर ही वृत्ती वाढू लागली आहे.
जरा मोठी झाली कि, ती आईबाबांचेही ऐकत नाहीत.
घरात शांतपणे एकत्रीत चर्चा, विचारविनिमय किंवा संवाद घडत नाही.
होतात ती फक्त आईबाबा किंवा भावंडे यांच्यात एकमेकात भरपूर भांडणे.
यात लग्न हा एक मोठा व आयुष्यात एकदाच व्हावा. असा पवित्र संस्कार आहे…. हे या आग्रही स्वमग्न मुलांना कोण शिकवणार,?
एकदाच स्विकारताना आपल्याला शोभेल असं शिक्षण… नोकरी… सम विचार. काही संस्कार आणि घरची स्थिती माणसे बघुन पसंत करावे.
मग मात्र होईल त्याला संयम, सहनशिलता, तडजोड प्रेम यातुन तोंड देत विवेकाने मात करत पुढे यावे.
प्रेम व मायेने दोघांनी दोन्हीकडची नाती आदराने मानावित .अडलं नडलं मदत करावी.
तर कुठे संसार यशस्वी होण्यास मदत होते.
पण हाती गलेलठ्ठ पगार येणारे मुलं मुली . .. चैन, चंगळ, फॅशन याच्या इतकी आहारी गेली आहे कि, स्थळ मग ते मुलाचे किंवा मुलीचे कसं व कोणता विचार करुन स्विकारावे याचा विवेकच ऊरला नाही.
शाळेपासुन आकर्षणाला बळी पडत कित्येक मुलं मुली अगोदरच फसवुन घेत आहेत.
कॉलेज मधे तर धर्म, जात व परिस्थिती कोणताच भेद ऊरला नाही.
जे घडू नये ते केव्हाही…. कधीही… कोणत्याही वयात घडू लागलंय.
मुलंच काय मुलीही व्यसनात खुप पुढे गेल्यात.
संस्कार नाहीत मग विवेक कुठून येणार?
या अविवेकात किती संबंध जोडले जातात. तुटतातही. कारण भ्रमर वृत्ती बोकाळली आहेच.
त्यातुन मुलांच्यापेक्षाही जास्त मुलींच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
मुलाची स्वत:ची जागा असावी….. मोठ्ठा पगार… घरात नोकर चाकर… गाडी इ. सर्वच हवं पण ते मुलासाठी राखणारी मोठी माणसे अजिबात नकोत.
कोणत्याही आर्थिक, कौटुंबिक जबाबदार्या नकोत,
पोषाख बाहेर एकटे फिरणे, मित्रमैत्रिणींबरोबर क्लब पार्ट्या यात कोणाचीच लुडबुड नको. हे हवंय मुलींना. त्यात खेड्यातला हुषार असला तरी शेतकरी अजिबात नको.. तिथला एखादा सुशिक्षित वकील किंवा ऊद्योजक नको. यांची मजा व्हावी यासाठी फक्त शहरवासीच हवा.
मध्यम वर्गीयांना हे परवडत नाही.
तर मुलांना नोकरी करून… घर मुलही सांभाळणारी… आईबाबांशी प्रेमाने वागणारी सुशिक्षित संस्कारीच मुलगी बायको म्हणुन हवी असते.
सगळेच काही श्रीमंत नसतात.
मग या अवस्थेत व्यसनांपासुन सगळं आमचंच खरं मानणार्या मुलीत या अपेक्षा कशा टिकणार?
आता कोण वडपौर्णिमा, हरतालिका, उपास तापास इ. हिंदू रिती रिवाज परंपरा चालू ठेवणार आहेत?
हे इतरही धर्मांना लागू पडतंय.
मग सांगा सहजासहजी पूर्वी जरूर त्या गोष्टी बघुन जशी लग्न ठरायची… व ठरली की ती निभवायचीच… अशी काही सोय ऊरली आहे का?
त्यामुळेच… घटस्फोट… अनेक लग्न… लिव्ह इन. रिलेशन शीप.. ब्रेक अप्स,…. मुलंच नकोत… इतक्या अविचारा पर्यंत ही पिढी पोचली आहे.
त्यामुळे मुलांना काय किंवा मुलींना काय!
मनपसंत जोडीदार मिळणं व तो आयुष्यभर टिकणं फारच कठीण होऊन बसलंय.
स्त्री शिकली.. कमावती व स्वतंत्र झाली.. पण त्याचा अवाजवी ऊपयोग पुरूषांशी बरोबरी करणं आणि स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार हे मानण्यात बळी पडलं.
समाज मुळातच विवाह हा पवित्र संस्कार आहे. या समजुतीवरच सुरक्षित व स्थिर होता.
त्या विचारांना सुरूंग लागला आहे.

लेखिका
अनुराधा जोशी
अंधेरी मुंबई ६९

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here